शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

मध्यप्रदेश - संतप्त शेतक-यांनी फाडले जिल्हाधिका-याचे कपडे

By admin | Updated: June 7, 2017 11:18 IST

मध्यप्रदेशातील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून तणाव वाढला आहे

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 7 - मध्यप्रदेशातील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून तणाव वाढला आहे. बुधवारी सकाळी बरखेडापंत गावातील शेतक-यांनी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह नेऊन रस्त्यावर आंदोलन करत चक्काजाम केला होता. तणाव वाढत चालल्याचं पाहून प्रशासनाने परिसरात कर्फ्यू जाहीर केला. जिल्ह्यातील काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेतक-यांनी मंदसौरच्या जिल्हा दंडाधिका-यासोबत धक्काबुक्की केल्याचं वृत्त आहे. शेतक-यांचा संताप पाहता अधिका-यांनीही तेथून पळ काढला. शेतक-यांनी तर जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांना मारहाण करत त्यांचे कपडेही फाडून टाकले. 
 
महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम मध्यप्रदेशातही शेतकरी 1 जूनपासून आंदोलन करत आहेत. मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला. अजूनही शेतक-यांच्या अंगावर गोळी लागल्याचे निशाण असताना जिल्हा प्रशासन मात्र गोळीबार केला नसल्याचं म्हणत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांनी पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकऱणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. 
 
पोलिसांना शेतक-यांवर कोणत्याही परिस्थितीत गोळीबार न करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मृत्यू झालेल्या शेतक-यांची ओळख पटली असून कन्हैयालाल पाटीदार, बबलू पाटीदार, चेन सिंह पाटीदार, अभिषेक पाटीदार आणि सत्यनारायण अशी त्यांची नावे आहेत. अभिषेक आणि सत्यनारायण यांना उपचारासाठी इंदोरला नेलं जात असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. 
 
पोलिसांनी मात्र ना आम्ही गोळी चालवली, ना चालवण्याचा आदेश दिला अशी माहिती दिल्याचं स्वतंत्र सिंह यांनी सांगितलं आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. 
 
 
दरम्यान गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंदसौरला जाणार असल्याची माहिती आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांना मंदसौर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. 
 
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरून मंगळवारी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारचे शेतकऱ्यांशी युद्ध सुरू असून, ते आपले हक्क मागणाऱ्या अन्नदात्यांना बंदुकीच्या गोळ्या भरवत आहे, असे ते म्हणाले.
 
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे ट्विट राहुल यांनी केले.
 
पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन मंगळवारी हिंसक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केले. गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू करण्यासह इंटरनेटवर बंदी घातली आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
राज्याच्या मंदसौर जिल्ह्यातील दलौदा येथे संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांत चकमक तसेच दगडफेक झाली. एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आठ मालमोटारी (ट्रक) आणि दोन दुचाकींना आगीच्या हवाली केले आणि पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दगडफेकही केली.