शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

म. गांधीजी बहुआयामी व्यक्तीमत्वाचे होते (भाग २)

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

एस. क्यू. जामा म्हणाले, महात्मा गांधी हे नाव नाही तर एक विचार आहे. त्यांनी सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशासाठी लढाई केली. आज त्यांच्या विचाराची गरज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे आणि त्यांचे विचार जगाला भुरळ घालत आहेत. त्याचा प्रत्ययही आपल्याला येतो. प्राचार्य आत्माराम उखळकर म्हणाले, गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराज पुस्तकात या देशाच्या प्रगतीचा मार्ग लिहून ठेवला आहे. त्याच विचारांनी त्यांनी आयुष्यभर कार्य केले पण आपण त्यांच्या विचारांवर राज्य चालविले नाही. अन्यथा देशाचे आजचे चित्र वेगळे राहिले असते. औद्योगिकीकरणापूर्वी ग्रामीण भारताचा विकास साधण्याचे त्यांचे तंत्र होते. पंचवार्षिक योजना ग्रामीण विकासासाठी राबविल्या असत्या तर शेतकरी आणि ग्रामीण भारत स्वयंपूर्ण झाला असता. त्यानंतर उद्योग उभारणी करता आली असती. पण औद्योगिक धोरण राबविल्य्

एस. क्यू. जामा म्हणाले, महात्मा गांधी हे नाव नाही तर एक विचार आहे. त्यांनी सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशासाठी लढाई केली. आज त्यांच्या विचाराची गरज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे आणि त्यांचे विचार जगाला भुरळ घालत आहेत. त्याचा प्रत्ययही आपल्याला येतो. प्राचार्य आत्माराम उखळकर म्हणाले, गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराज पुस्तकात या देशाच्या प्रगतीचा मार्ग लिहून ठेवला आहे. त्याच विचारांनी त्यांनी आयुष्यभर कार्य केले पण आपण त्यांच्या विचारांवर राज्य चालविले नाही. अन्यथा देशाचे आजचे चित्र वेगळे राहिले असते. औद्योगिकीकरणापूर्वी ग्रामीण भारताचा विकास साधण्याचे त्यांचे तंत्र होते. पंचवार्षिक योजना ग्रामीण विकासासाठी राबविल्या असत्या तर शेतकरी आणि ग्रामीण भारत स्वयंपूर्ण झाला असता. त्यानंतर उद्योग उभारणी करता आली असती. पण औद्योगिक धोरण राबविल्याने आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. विलास शेंडे यांनी प्रार्थना आणि बंधूता या विषयावर मत व्यक्त करताना गांधीजींच्या प्रार्थनेचे महत्त्व विशद केले. ते सर्वच धर्मांच्या प्रार्थना करीत होते. प्रार्थनेतून बंधूता आपोआप निर्माण होते, असे ते म्हणाले. सर्वोदयी विचारवंत देशपांडे गुरुजी यांनी सर्वधर्म प्रार्थना विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. गांधीजींच्या प्रार्थनासभेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. त्यांच्या प्रार्थनासभेत सर्व धर्मांचे लोक सहभागी होत होते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन गांधी विचार प्रसारक रवी गुडधे यांनी केले.