शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

अरुणाचलमध्ये फुलले ‘कमळ’

By admin | Updated: January 1, 2017 01:41 IST

मुख्यंमत्री पेमा खंडू यांच्यासह सत्ताधारी ‘पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल’ (पीपीए) या पक्षाचे ४३ पैकी ३३ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने अरुणाचल

इटानगर : मुख्यंमत्री पेमा खंडू यांच्यासह सत्ताधारी ‘पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल’ (पीपीए) या पक्षाचे ४३ पैकी ३३ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने अरुणाचल प्रदेशात शनिवारी निवडणुकीविना सत्तांतर झाले. अशा प्रकारे पक्षांतराच्या माध्यमातून का होईना भाजपाला ईशान्येकडील राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे स्वत:चे सरकार आणण्यात यश आले.अरुणाचलमधील वर्षभराची राजकीय अस्थिरता गेल्या दोन दिवसांत शिगेला पोहोचली. सत्ताधारी ‘पीपीए’ पक्षाने पक्षविरोधी कारवायांचा आरोप करून मुख्यमंत्री खंडू यांच्यासह १४ आमदारांना पक्षातून निलंबित केले आणि उघडपणे पक्ष सोडण्याचे निमित्त शोधणाऱ्यांना नामी संधी मिळाली.मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह ३३ आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे औपचारिक पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले व ‘पीपीए’मधील संघर्षाला पूर्णविराम मिळाला.मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षही भाजपावासी झाले. त्यांना भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री खंडू यांनी पत्रकार परिषद घेऊन एकगठ्ठा पक्षांतराचा निर्णय जाहीर केला. आता माझे सरकार भाजपाचे झाले आहे व आमच्याकडे ६० पैकी ४७ असे दणकट बहुमत आहे, असे त्यांनी सांगितले.खंडू म्हणाले की, आम्ही एरवीही भाजपाच्या वाटेवर होतोच. ‘पीपीए’ नेतृत्वाच्या बेकायदा निलंबन कारवाईने त्यास गती मिळाली, एवढेच. ‘पीपीए’च्या अध्यक्षांवर त्यांनी हुकुमशाही व एकाधिकारशाहीने वागण्याचा आरोप केला.भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनीही टिष्ट्वट करून अरुणाचलमधील सत्तांतराची व तेथे भाजपाचे सरकार आल्याची ‘आनंदाची’ बातमी दिली. (वृत्तसंस्था)पीपीपीचे शिल्लक दहा आमदार विरोधी बाकांवर६० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे स्वत:चे १२ आमदार आहेत. त्यात खंडूंसह ३३ नवे आमदार मिळाल्याने भाजपाचे संख्याबळ ४५वर पोहोचले. याखेरीज दोन अपक्षही सोबत असल्याने खंडू यांच्या ‘भगव्या’ सरकारला एकूण ४७ आमदारांचा पाठिंबा असेल. काँग्रेसचे तीनपैकी दोन आमदारही भाजपाच्या वाटेवर आहेत.त्यांनीही पक्षांतर केले की विधानसभेत ‘पीपीए’चे शिल्लक राहिलेले १० व एक अपक्ष एवढे अकराच सदस्य विरोधी बाकांवर असतील.