शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

अरुणाचलमध्ये फुलले ‘कमळ’

By admin | Updated: January 1, 2017 01:41 IST

मुख्यंमत्री पेमा खंडू यांच्यासह सत्ताधारी ‘पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल’ (पीपीए) या पक्षाचे ४३ पैकी ३३ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने अरुणाचल

इटानगर : मुख्यंमत्री पेमा खंडू यांच्यासह सत्ताधारी ‘पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल’ (पीपीए) या पक्षाचे ४३ पैकी ३३ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्याने अरुणाचल प्रदेशात शनिवारी निवडणुकीविना सत्तांतर झाले. अशा प्रकारे पक्षांतराच्या माध्यमातून का होईना भाजपाला ईशान्येकडील राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे स्वत:चे सरकार आणण्यात यश आले.अरुणाचलमधील वर्षभराची राजकीय अस्थिरता गेल्या दोन दिवसांत शिगेला पोहोचली. सत्ताधारी ‘पीपीए’ पक्षाने पक्षविरोधी कारवायांचा आरोप करून मुख्यमंत्री खंडू यांच्यासह १४ आमदारांना पक्षातून निलंबित केले आणि उघडपणे पक्ष सोडण्याचे निमित्त शोधणाऱ्यांना नामी संधी मिळाली.मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह ३३ आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे औपचारिक पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले व ‘पीपीए’मधील संघर्षाला पूर्णविराम मिळाला.मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षही भाजपावासी झाले. त्यांना भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री खंडू यांनी पत्रकार परिषद घेऊन एकगठ्ठा पक्षांतराचा निर्णय जाहीर केला. आता माझे सरकार भाजपाचे झाले आहे व आमच्याकडे ६० पैकी ४७ असे दणकट बहुमत आहे, असे त्यांनी सांगितले.खंडू म्हणाले की, आम्ही एरवीही भाजपाच्या वाटेवर होतोच. ‘पीपीए’ नेतृत्वाच्या बेकायदा निलंबन कारवाईने त्यास गती मिळाली, एवढेच. ‘पीपीए’च्या अध्यक्षांवर त्यांनी हुकुमशाही व एकाधिकारशाहीने वागण्याचा आरोप केला.भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनीही टिष्ट्वट करून अरुणाचलमधील सत्तांतराची व तेथे भाजपाचे सरकार आल्याची ‘आनंदाची’ बातमी दिली. (वृत्तसंस्था)पीपीपीचे शिल्लक दहा आमदार विरोधी बाकांवर६० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे स्वत:चे १२ आमदार आहेत. त्यात खंडूंसह ३३ नवे आमदार मिळाल्याने भाजपाचे संख्याबळ ४५वर पोहोचले. याखेरीज दोन अपक्षही सोबत असल्याने खंडू यांच्या ‘भगव्या’ सरकारला एकूण ४७ आमदारांचा पाठिंबा असेल. काँग्रेसचे तीनपैकी दोन आमदारही भाजपाच्या वाटेवर आहेत.त्यांनीही पक्षांतर केले की विधानसभेत ‘पीपीए’चे शिल्लक राहिलेले १० व एक अपक्ष एवढे अकराच सदस्य विरोधी बाकांवर असतील.