शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

हरवलेला मुलगा चुकून आला स्वत:च्याच घरात राहायला

By admin | Updated: February 8, 2017 01:30 IST

हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई मंदिर-दर्गा सर्वत्र नवस करत होती. मुलाच्या शोधासाठी धावाधाव करीत होती, पण अचानक त्यांना एके

पाटणा : हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई मंदिर-दर्गा सर्वत्र नवस करत होती. मुलाच्या शोधासाठी धावाधाव करीत होती, पण अचानक त्यांना एके दिवशी कळलं की आपल्या घरात गेले २0 दिवस जो मुलगा भाडेकरू म्हणून राहतो आहे, तो आपला स्वत:चाच मुलगा आहे. आई-आणि मुलाच्या पुनर्भेटीची ही घटना चित्रपटातील आहे, असे वाटेल, पण ती खरीखुरी आहे. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील फुलबडिया येथील शबाना परवीन यांचा मुलगा २00९ साली गावातीलच जावळाच्या कार्यक्रमाला गेला असता तेथून अचानक गायब झाला. खूप शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. पोलीस ठाण्यातही तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला, पण तो सापडेना. मुलगा परत मिळावा, यासाठी आईने अजमेरच्या मोईनुद्दिन चिस्तीच्या दर्ग्यापासून मुंबईतील हाजीअली दर्ग्यापर्य$ंत नवस केले, पण त्यातूनही काही निष्पन्न झाले आहे. अखेर ६ वर्षांनी तो त्यांना स्वत:च्या ७ जानेवारी रोजी घरातच सापडला. शबाना परवीन यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या रिक्षावाल्याला बरौनी येथे एक मुलगा भटकताना दिसला. त्याने या मुलाची चौकशी केली, तेव्हा त्याने आपले नाव राजू सांगितले. मला काही तरी काम द्या, असे तो म्हणाला. त्यावेळी रिक्षावाल्याला शबाना परवीन यांचा मुलगा हरवल्याची माहितीही नव्हती. त्यामुळे तो राजूला घेऊन घरी आला. अचानक आलेल्या या मुलाला परवीन यांनी पाहिले आणि हाच तो आपला मुलगा, अशी त्यांची खात्रीच पटली. राजू मात्र आईला ओळखू शकला नाही. आईने त्याला लहानपणीचा फोटोंचा आल्बम दाखवला, तेव्हा मात्र त्याचाही विश्वास बसला. जावळाच्या कार्यक्रमातून काही लोकांनी राजूला बळजबरीने उचलून नेले होते. इन्जेक्शन आणि औषधे देऊन त्याला एका ठिकाणी ठेवण्यात आले. अपहरण करणाऱ्याने तू माझाच मुलगा आहे, असे त्याला सांगितले. अगदीच लहान असल्याने त्याला काही कळत नव्हते, पण तो मोठा झाला आणि तोपर्यंत त्या दाम्पत्यालाच आपले पालक मानू लगला. एकदा घराबाहेर खेळत असताना एका मित्राने त्याला सांगितले की, त्याचे आई-वडील खोटे बोलत आहेत. त्याला इथे पळवून आणण्यात आले होते. हे कळताच राजूने तेथून पळ काढला. आपले घर रेल्वे स्थानकाजवळ आहे, याखेरीज त्याला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळे त्याने वाराणसी, अलाहाबाद, देवरियासह अनेक स्थानकांवर रात्र घालवली, पण त्याला स्वत:चे घर सापडले नाही. पोट भरण्यासाठी तो कोणत्याही हॉटेल, ढाबा वा चहाच्या दुकानात काम करायचा आणि काही दिवसांनी पुन्हा घराच्या शोधात निघायचा. असे करता करता एके दिवशी तो बरौनी गावात आला. तिथेच त्याची अरमान या रिक्षावाल्याशी गाठ पडली त्याच्यासोबतच राजू स्वत:च्याच आईच्या घरात राहायला लागला. मात्र घरामध्ये आणि परिसरामध्ये बरेच बदल झाले असल्याने त्याला ते लक्षातही आले नाही. पोलीस अधीक्षक रंजीत कुमार मिश्र यांनी २00९ मध्ये बेपत्ता झालेला राजू सापडला असल्याचे सांगितले. राजूला आता न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तो लवकरच अधिकृतपणे स्वत:च्या घरात परवीन यांचा मुलगा म्हणून राहू लागेल.