शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीच्या लुटीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 02:08 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा समावेश पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) करणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा समावेश पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) करणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी केले. त्यास पिंपरी-चिंचवड परिसरातून विरोध होत आहे. ‘पिंपरी-चिंचवडमधील भूमिहीनांच्या जमिनीवर डल्ला आहे. पिंपरी-चिंचवडची लूट करण्याचा हा डाव आहे. पीएमाआरडीएत नव्हे तर महापालिकेत समावेश करावा, अशी मागणी होत आहे.’मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ‘पीएमआरडीए’ची बैठक झाली. या वेळी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीनीकरणावर चर्चा झाली होती. पालकमंत्री बापट पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी विलीनीकरणास दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.लोककल्याणासाठी हा निर्णय असेल, असे समर्थन भाजपा खासदार अमर साबळे यांनी केले आहे. तर शिवसेना खासदारांनी विरोध केला आहे. ‘प्राधिकरणाचे क्षेत्र विलीनीकरण करणे म्हणजेच पिंपरी-चिंचवड करांवरती राज्यसरकारने केलेला अन्याय असून प्राधिकरणाकडे असणाºया कोट्यवधी रुपयाच्या ठेवी व हजारो कोटींची जमीन यावर डोळा ठेवून निर्णय घेतल्याची टीका बारणे यांनी केली आहे. या निर्णयाला विविध राजकीय पक्षांनी विरोध केला आहे़ पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन करणे हे पिंपरी-चिंचवडकरांवर अन्यायकारक आहे.विलीनीकरणास शिवसेनेचा विरोध आहे़ प्राधिकरण हद्दीतील गरीब नागरिकांनी बांधलेल्या अनधिकृत घरांचा प्रश्न व शेतकºयांच्या साडेबारा टक्केपरतावा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला नाही. प्राधिकरणात महापालिकेने सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत प्राधिकरण विलीन करावे. विलीन होत नसल्यास बरखास्त करावे. अन्यथा याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.- श्रीरंग बारणे, खासदारप्राधिकरणाविषयी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य राहील. परंतु प्राधिकरण हे महापालिकेत समाविष्ट करावे, अशी वैयक्तिक मागणी आहे. कारण हा भाग भौगोलिक दृष्ट्या पिंपरी-चिंचवडचाच आहे. त्यामुळे नियोजन आणि विकासकामांच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात असणे संयुक्तीक ठरणार आहे. तसेच प्राधिकरणाबाबत निर्णय घेत असताना शेतकºयांचे प्रलंबित प्रश्नही सोडविणे गरजेचे आहे.- नितीन काळजे, महापौरसत्ताधारी उठले शेतकºयांच्या मुळावरप्राधिकरण विलीनीकरणाचा निर्णय हा संधीसाधुपणाचा असल्याची टीका होत आहे. गोरगरीब शेतकºयांची जमीन कवडीमोल किमतीमध्ये घेऊन गरिबांसाठी घरे उभारण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. सत्ताधारी येथील शेतकºयांच्या मुळावर उठले आहे़ अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा या सरकारने केली असून, मोठ्या प्रमाणावर दंड व जाचक अटींमुळे आजपर्यंत एकाही नागरिकाने बांधकामे अधिकृत करण्याबाबत अर्ज दाखल केला नाही. सरकार पिंपरी-चिंचवडकरांच्या भावनांशी खेळत आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट