शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

नव्या आधुनिक यंत्रणेद्वारे औद्योगिक प्रदूषणावर नजर

By admin | Updated: March 7, 2016 22:54 IST

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीऔद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे. हवा आणि पाण्यात नियंत्रित मानकांपेक्षा अधिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये दर १५ मिनिटाला उल्लंघनाचे प्रमाण किती, याचा ग्राफसह अहवाल देणारी यंत्रणा या संयत्रांमुळे कार्यरत झाली आहे. प्रदूषणावर २४ तास देखरेख ठेवणारी ही आधुनिक संयत्रे कारखान्यांनीच बसवली असून, उद्योग क्षेत्रातल्या बहुतांश कारखान्यांनी स्वयंस्फूर्तीने केंद्र सरकारच्या योजनेला साथ दिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.योजनेचे तपशील देताना जावडेकर म्हणाले, प्रदूषणात भर घालणाऱ्या कारखान्यांची तपासणी यापूर्वी सरकारच्या निरीक्षकांमार्फत होत असे. ती पद्धत शास्त्रशुद्ध नव्हती आणि हवा आणि पाण्याच्या प्रदूषणात कोणत्या कारखान्याने किती भर घातली, ते सिद्ध करणारा पुरावाही उपलब्ध होत नसे. प्रदूषणात मोठी भर घालणारे कारखाने पर्यावरण मंत्रालयाने शोधून काढले. त्यात सर्वाधिक प्रदूषण पसरवणाऱ्या ३१४५ उद्योगांपैकी, आजमितीला २८२४ उद्योग सुरू आहेत. आमच्या प्रयत्नांमुळे यातील २२३१ म्हणजे जवळपास ८0 टक्के उद्योगांवर ३१ मार्च २0१६ अखेर प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करणारी संयंत्रे कार्यरत होत आहेत.हवेतील पार्टिकल्स, सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रोजन डाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, तसेच पाण्यात मिसळणारे बायो केमिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी) केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी) टोटल सस्पेंडेड सॉलिड (टीएसएस) अमोनिकल नायट्रोजन इत्यादी १७ प्रकारच्या प्रदूषणाचा शोध लावण्यात, त्यांचे प्रमाण दर्शवण्यात ही संयंत्रे सक्षम आहेत. आजमितीला ११0१ कारखान्यांनी बसवलेल्या संयंत्रांशी पर्यावरण मंत्रालयाचा संपर्क स्थापित झाला आहे. प्रत्येक कारखान्याने अशी संयंत्रे लवकरात लवकर बसवावीत असे केंद्राचे निर्देश आहेत. त्यातील ५४४ उद्योगांनी त्याचे पालन केले नसून, त्यापैकी १४४ उद्योगांवर सरकारने कारवाई केली आणि प्रदूषण पसरवणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. नवी संयंत्रे बसवल्याशिवाय आता हे कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत. याखेरीज ४0३ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, असून नियोजित वेळेत सरकारचे निर्देश न पाळल्यास ते कारखानेही बंद केले जातील. त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, असे जावडेकर म्हणाले.