शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आधुनिक यंत्रणेद्वारे औद्योगिक प्रदूषणावर नजर

By admin | Updated: March 7, 2016 22:54 IST

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीऔद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे. हवा आणि पाण्यात नियंत्रित मानकांपेक्षा अधिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये दर १५ मिनिटाला उल्लंघनाचे प्रमाण किती, याचा ग्राफसह अहवाल देणारी यंत्रणा या संयत्रांमुळे कार्यरत झाली आहे. प्रदूषणावर २४ तास देखरेख ठेवणारी ही आधुनिक संयत्रे कारखान्यांनीच बसवली असून, उद्योग क्षेत्रातल्या बहुतांश कारखान्यांनी स्वयंस्फूर्तीने केंद्र सरकारच्या योजनेला साथ दिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.योजनेचे तपशील देताना जावडेकर म्हणाले, प्रदूषणात भर घालणाऱ्या कारखान्यांची तपासणी यापूर्वी सरकारच्या निरीक्षकांमार्फत होत असे. ती पद्धत शास्त्रशुद्ध नव्हती आणि हवा आणि पाण्याच्या प्रदूषणात कोणत्या कारखान्याने किती भर घातली, ते सिद्ध करणारा पुरावाही उपलब्ध होत नसे. प्रदूषणात मोठी भर घालणारे कारखाने पर्यावरण मंत्रालयाने शोधून काढले. त्यात सर्वाधिक प्रदूषण पसरवणाऱ्या ३१४५ उद्योगांपैकी, आजमितीला २८२४ उद्योग सुरू आहेत. आमच्या प्रयत्नांमुळे यातील २२३१ म्हणजे जवळपास ८0 टक्के उद्योगांवर ३१ मार्च २0१६ अखेर प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करणारी संयंत्रे कार्यरत होत आहेत.हवेतील पार्टिकल्स, सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रोजन डाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, तसेच पाण्यात मिसळणारे बायो केमिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी) केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी) टोटल सस्पेंडेड सॉलिड (टीएसएस) अमोनिकल नायट्रोजन इत्यादी १७ प्रकारच्या प्रदूषणाचा शोध लावण्यात, त्यांचे प्रमाण दर्शवण्यात ही संयंत्रे सक्षम आहेत. आजमितीला ११0१ कारखान्यांनी बसवलेल्या संयंत्रांशी पर्यावरण मंत्रालयाचा संपर्क स्थापित झाला आहे. प्रत्येक कारखान्याने अशी संयंत्रे लवकरात लवकर बसवावीत असे केंद्राचे निर्देश आहेत. त्यातील ५४४ उद्योगांनी त्याचे पालन केले नसून, त्यापैकी १४४ उद्योगांवर सरकारने कारवाई केली आणि प्रदूषण पसरवणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. नवी संयंत्रे बसवल्याशिवाय आता हे कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत. याखेरीज ४0३ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, असून नियोजित वेळेत सरकारचे निर्देश न पाळल्यास ते कारखानेही बंद केले जातील. त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, असे जावडेकर म्हणाले.