शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितांपायी काँग्रेसकडून भारताचं विभाजन- पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 22:54 IST

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितापायी काँग्रेसनं धार्मिक आधारावर भारताचं विभाजन करणाऱ्या द्विराष्ट्राच्या सिद्धांताचा स्वीकार केला. पीयूष गोयल यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केलं. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात पीयूष गोयल बोलत होते. 

1947ला काँग्रेस पक्षानं भारताचं दोन राष्ट्रांत विभाजन केलं. त्यांनी भारताला धर्माच्या आधारावर विभाजित केलं. आमचे बहीण-भाऊ धर्माच्या आधारेच विभक्त झाले. बांगलादेश असो किंवा पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांची संकल्पना कोणी रचली?, एका व्यक्तीच्या स्वार्थापायी काँग्रेसनं भारताचं विभाजन केलं. कारण काँग्रेसमधली ती व्यक्ती पंतप्रधानपदाचा त्याग करू इच्छित नव्हती. त्यामुळे धर्माच्या आधारावर भारताचं विभाजन केलं. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधल्या अल्पसंख्याकांवर कायम अत्याचार होत राहिले. आम्ही हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना भारतीय नागरिक बनण्याची संधी देत आहोत. तसेच एनसीआरच्या माध्यमातून गोयल यांनी घुसखोरांना बाहेर फेकणार असल्याचंही सांगितलं आहे. तर निर्वासितांना कोणतीही चिंता करण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.रेल्वेची अवस्था अतिशय बिकट असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावरही गोयल यांनी भाष्य केलं. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं रेल्वेवर 22 हजार कोटींचा बोजा पडला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेत केली जाणारी गुंतवणूक दीडपटीनं वाढली आहे. मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याशिवाय सुरक्षेवर केला जाणारा खर्चदेखील वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड