शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Lokmat Parliamentary Awards: एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितांपायी काँग्रेसकडून भारताचं विभाजन- पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 22:54 IST

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितापायी काँग्रेसनं धार्मिक आधारावर भारताचं विभाजन करणाऱ्या द्विराष्ट्राच्या सिद्धांताचा स्वीकार केला. पीयूष गोयल यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केलं. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात पीयूष गोयल बोलत होते. 

1947ला काँग्रेस पक्षानं भारताचं दोन राष्ट्रांत विभाजन केलं. त्यांनी भारताला धर्माच्या आधारावर विभाजित केलं. आमचे बहीण-भाऊ धर्माच्या आधारेच विभक्त झाले. बांगलादेश असो किंवा पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांची संकल्पना कोणी रचली?, एका व्यक्तीच्या स्वार्थापायी काँग्रेसनं भारताचं विभाजन केलं. कारण काँग्रेसमधली ती व्यक्ती पंतप्रधानपदाचा त्याग करू इच्छित नव्हती. त्यामुळे धर्माच्या आधारावर भारताचं विभाजन केलं. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधल्या अल्पसंख्याकांवर कायम अत्याचार होत राहिले. आम्ही हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना भारतीय नागरिक बनण्याची संधी देत आहोत. तसेच एनसीआरच्या माध्यमातून गोयल यांनी घुसखोरांना बाहेर फेकणार असल्याचंही सांगितलं आहे. तर निर्वासितांना कोणतीही चिंता करण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.रेल्वेची अवस्था अतिशय बिकट असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावरही गोयल यांनी भाष्य केलं. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं रेल्वेवर 22 हजार कोटींचा बोजा पडला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेत केली जाणारी गुंतवणूक दीडपटीनं वाढली आहे. मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याशिवाय सुरक्षेवर केला जाणारा खर्चदेखील वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड