शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘सूटबूट की सरकार’ म्हणत ‘लोकसभा’ जिंकली

By admin | Updated: April 20, 2015 23:53 IST

सुटी घालवून परतलेल्या राहुल गांधी यांचे आक्रमक रूप सोमवारी लोकसभेत बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गरिबांचा कैवारी कोण’ ही स्पर्धा सुरू केल्याचे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीसुटी घालवून परतलेल्या राहुल गांधी यांचे आक्रमक रूप सोमवारी लोकसभेत बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गरिबांचा कैवारी कोण’ ही स्पर्धा सुरू केल्याचे पाहता राहुल यांनी लोकसभेचे सभागृह जिंकत निसटती का होईना बाजी मारली आहे. त्यांचे ‘सूट बूट की सरकार’ हे विधान लगेचच व्हायरल होऊन त्याची चर्चाही सुरू झाली.आपल्या २२ मिनिटांच्या सडेतोड भाषणात राहुल यांनी कधी किस्से तर कधी उपरोधिक टोलेबाजी केली. गरीब शेतकऱ्यांची किंमत चुकवत ‘सूट बूट की सरकार’ मोजक्या कॉर्पोरेट हाऊसची सेवा करीत आहे, असे त्यांनी म्हटले तेव्हा भाजपचे काही मंत्री सभागृहात अवाक्पणे बघत होते. मोदी सरकारवर कधी वैयक्तिक टीका करतानाही या मंत्र्यांनी आक्षेप घेण्याचे टाळले. उलट त्यांना बोलू द्या म्हणत संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी भाजपच्या खासदारांना शांत केले. आपली वेळ येईल तेव्हा उत्तर देऊ, असे म्हणत नायडूंनी त्यांची समजूत काढली.१८० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असे तज्ज्ञ सांगत असताना पंतप्रधान मोदी १०६ लाख हेक्टर तर कृषिमंत्री केवळ ८० लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे सांगत आहेत. खरे काय? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. त्यावर राधामोहनसिंग म्हणाले की, विविध राज्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अंदाज लावण्यात आला आहे. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या चर्चेतून ८० लाख हेक्टरचा आकडा मिळाला आहे.‘मन की बात’ऐवजी शेतकऱ्यांकडे जा मोदींनी गाजावाजा केलेल्या ‘मन की बात’वर उपरोधिक शेरा मारताना राहुल गांधी म्हणाले, पीडित शेतकऱ्यांशी ‘मन की बात’ करण्याऐवजी पंतप्रधान देशात फिरत का नाहीत. त्यावर भाजपच्या नेत्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.