शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी

By admin | Updated: September 28, 2016 01:11 IST

लोकसभा आणि देशातल्या तमाम राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, याबाबत देशातल्या राजकीय पक्षांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर या संकल्पनेला आयोगाचा

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीलोकसभा आणि देशातल्या तमाम राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, याबाबत देशातल्या राजकीय पक्षांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर या संकल्पनेला आयोगाचा पाठिंबा आहे, असे मत व्यक्त करीत, दोन्ही निवडणुका ५ वर्षात एकदा व एकाच वेळी आयोजित करण्यास आयोगाची तयारी असल्याची भूमिका निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. उत्तरप्रदेशच्या आगामी निवडणुका संभवत: जानेवारीत घेण्याचे संकेत त्यांनी दिले.निवडणुका एकाच वेळी आयोजित करण्याबाबत हेच मत निवडणूक आयोगाने मे महिन्याच विधी मंत्रालयाच्या स्थायी समितीला लेखी स्वरूपात कळवले आहे. ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी तर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरपणे याच संकल्पनेचा पुरस्कार केला होता. आयोगाच्या ताज्या भूमिकेमुळे दोघांच्याही मताला एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे.भारतात दरवर्षी वेगवेगळया राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने निवडणुकांच्या प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. या निमित्ताने लागू होणाऱ्या आदर्श आचार संहितेमुळेही गुड गव्हर्नन्स संकल्पनेत मोठे अडथळे निर्माण होत असून सरकारचे कामकाज वारंवार खोळंबते. ही कारणे अधोरेखित करीत, केंद्रीय विधी मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा पुरस्कार केला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत स्थायी समितीकडे आपली अनुकूलता नोंदवतांना निवडणूक आयोगाने या अवाढव्य निवडणुकांसाठी ईव्हीएम, तसेच व्होटर व्हेरिफायेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हिव्हिपॅट) मशिन्सची संख्या मोठया प्रमाणात वाढवावी लागेल, असे स्पष्ट केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यासाठी ९२८४.१२ कोटी रूपयांचा खर्च येईल. दर १५ वर्षांनी मशिन्स बदलावी लागतील. हा खर्च वारंवार होईल. एकत्रित निवडणुकांसाठी अन्य साधनसामुग्री, मनुष्यबळ तसेच बंदोबस्तासाठी फौजफाटा व आर्थिक तरतूदींबाबतही आयोगाने काही मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत. म्हणून विस्कटले वेळापत्रक- लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना नवी नाही. १९५२ साली लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. त्यानंतर १९५७, १९६२ व १९६७ अशा तीन सार्वत्रिक निवडणुकांमधे दोन्ही निवडणुकांचे मतदान एकाच वेळी झाले.