शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी

By admin | Updated: September 28, 2016 01:11 IST

लोकसभा आणि देशातल्या तमाम राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, याबाबत देशातल्या राजकीय पक्षांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर या संकल्पनेला आयोगाचा

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीलोकसभा आणि देशातल्या तमाम राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात, याबाबत देशातल्या राजकीय पक्षांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर या संकल्पनेला आयोगाचा पाठिंबा आहे, असे मत व्यक्त करीत, दोन्ही निवडणुका ५ वर्षात एकदा व एकाच वेळी आयोजित करण्यास आयोगाची तयारी असल्याची भूमिका निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. उत्तरप्रदेशच्या आगामी निवडणुका संभवत: जानेवारीत घेण्याचे संकेत त्यांनी दिले.निवडणुका एकाच वेळी आयोजित करण्याबाबत हेच मत निवडणूक आयोगाने मे महिन्याच विधी मंत्रालयाच्या स्थायी समितीला लेखी स्वरूपात कळवले आहे. ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी तर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरपणे याच संकल्पनेचा पुरस्कार केला होता. आयोगाच्या ताज्या भूमिकेमुळे दोघांच्याही मताला एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे.भारतात दरवर्षी वेगवेगळया राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने निवडणुकांच्या प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. या निमित्ताने लागू होणाऱ्या आदर्श आचार संहितेमुळेही गुड गव्हर्नन्स संकल्पनेत मोठे अडथळे निर्माण होत असून सरकारचे कामकाज वारंवार खोळंबते. ही कारणे अधोरेखित करीत, केंद्रीय विधी मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा पुरस्कार केला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत स्थायी समितीकडे आपली अनुकूलता नोंदवतांना निवडणूक आयोगाने या अवाढव्य निवडणुकांसाठी ईव्हीएम, तसेच व्होटर व्हेरिफायेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हिव्हिपॅट) मशिन्सची संख्या मोठया प्रमाणात वाढवावी लागेल, असे स्पष्ट केले आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यासाठी ९२८४.१२ कोटी रूपयांचा खर्च येईल. दर १५ वर्षांनी मशिन्स बदलावी लागतील. हा खर्च वारंवार होईल. एकत्रित निवडणुकांसाठी अन्य साधनसामुग्री, मनुष्यबळ तसेच बंदोबस्तासाठी फौजफाटा व आर्थिक तरतूदींबाबतही आयोगाने काही मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत. म्हणून विस्कटले वेळापत्रक- लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची संकल्पना नवी नाही. १९५२ साली लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. त्यानंतर १९५७, १९६२ व १९६७ अशा तीन सार्वत्रिक निवडणुकांमधे दोन्ही निवडणुकांचे मतदान एकाच वेळी झाले.