शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना केले निलंबित

By admin | Updated: August 3, 2015 16:16 IST

काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तब्बल २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.

ऑनलाइन लोकमत

वारंवार ताकीद देऊनही तसेच चर्चेसाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गोंधळ घालणा-या तब्बल २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे.

काम न केल्यास खासदारांचे भत्ते कापण्याचा कतित प्रस्ताव, सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी आदी विषयांवर काँग्रेसच्या खासदारांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून रान उठवले आहे. जोपर्यंत आरोप ठेवलेल्या नेत्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर या विषयांवर चर्चा करण्यास आपण तयार असून या नेत्यांनी कुठलाही गुन्हा केला नसून त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका भाजपाने घेतल्यामुळे ही कोंडी कशी फुटणार असा प्रश्न अधिवेशन सुरू झाल्यापासून पडलेला आहे.

त्यात भर म्हणजे सभागृहामध्ये निषेधाचे फलक आणण्यास मनाई असताना काँग्रेसचे खासदार सातत्याने असे फलक दाखवत होते तसेच अध्यक्षांसमोरच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते. संख्याबळाच्या जोरावर भाजपा मुजोरीची भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर चर्चा झाली तर काँग्रेसचे बिंग फुटेल म्हणून काँग्रेस चर्चाच होऊ देत नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

सोमवारी गेल्या आठवड्याप्रमाणेच संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळाचेच वातावरण राहीले आणि अखेर लोकसभेमध्ये अध्यक्षांनी काँग्रेसच्या १३ जणांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची अभूतपूर्व घटना घडली.