शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे कोरोनापासून वाचले १४ ते २९ लाख लोक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:49 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील १४ ते २९ लाख लोक या संसर्गाची बाधा होण्यापासून बचावले तसेच आणखी ३७ ते ७८ हजार जणांचे मृत्यू रोखले गेले, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला. पीपीई, एन-९५ मास्क, व्हेंटिलेटर यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. विलगीकरण कक्षांसाठी खाटांची संख्या लॉकडाऊनच्या काळात ३६.२ पटीने वाढविण्यात आली. त्याआधी मार्च महिन्यात हीच संख्या २४.६ पटीने वाढविण्यात आली होती.लाखो खाटांची केली सोय१२ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर देशभरात १५,२८४ कोरोना उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यात आॅक्सिजन पुरवठ्याची सोय नसलेल्या १३,१४,६४६ खाटा उपलब्ध आहेत.आॅक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या २,३१,०९३ खाटा, अतिदक्षता विभागांतील ६२,७१७ खाटा तसेच ३२,५७५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.मृत्यूचे प्रमाण जगात सर्वांत कमी : डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, दर १० लाख लोकांमागे कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ३,३२८ व ५५ इतकेकमी राखण्यात भारताला यश आले आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे सर्वांत कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्णांची संख्या व बळी यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, आसाम, ओडिशा, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये आहे.सुरुवातीला देशात पीपीई बनण्याचे प्रमाण अगदीच कमी होते. मात्र आता या साधनांच्या निर्मितीबाबत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.- डॉ. हर्ष वर्धन,केंद्रीय आरोग्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद