शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

लॉकडाऊनमुळे कोरोनापासून वाचले १४ ते २९ लाख लोक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:49 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील १४ ते २९ लाख लोक या संसर्गाची बाधा होण्यापासून बचावले तसेच आणखी ३७ ते ७८ हजार जणांचे मृत्यू रोखले गेले, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला. पीपीई, एन-९५ मास्क, व्हेंटिलेटर यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. विलगीकरण कक्षांसाठी खाटांची संख्या लॉकडाऊनच्या काळात ३६.२ पटीने वाढविण्यात आली. त्याआधी मार्च महिन्यात हीच संख्या २४.६ पटीने वाढविण्यात आली होती.लाखो खाटांची केली सोय१२ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर देशभरात १५,२८४ कोरोना उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यात आॅक्सिजन पुरवठ्याची सोय नसलेल्या १३,१४,६४६ खाटा उपलब्ध आहेत.आॅक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या २,३१,०९३ खाटा, अतिदक्षता विभागांतील ६२,७१७ खाटा तसेच ३२,५७५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.मृत्यूचे प्रमाण जगात सर्वांत कमी : डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, दर १० लाख लोकांमागे कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ३,३२८ व ५५ इतकेकमी राखण्यात भारताला यश आले आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे सर्वांत कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्णांची संख्या व बळी यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, आसाम, ओडिशा, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये आहे.सुरुवातीला देशात पीपीई बनण्याचे प्रमाण अगदीच कमी होते. मात्र आता या साधनांच्या निर्मितीबाबत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.- डॉ. हर्ष वर्धन,केंद्रीय आरोग्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद