शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे कोरोनापासून वाचले १४ ते २९ लाख लोक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:49 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला.

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील १४ ते २९ लाख लोक या संसर्गाची बाधा होण्यापासून बचावले तसेच आणखी ३७ ते ७८ हजार जणांचे मृत्यू रोखले गेले, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला. पीपीई, एन-९५ मास्क, व्हेंटिलेटर यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. विलगीकरण कक्षांसाठी खाटांची संख्या लॉकडाऊनच्या काळात ३६.२ पटीने वाढविण्यात आली. त्याआधी मार्च महिन्यात हीच संख्या २४.६ पटीने वाढविण्यात आली होती.लाखो खाटांची केली सोय१२ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर देशभरात १५,२८४ कोरोना उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यात आॅक्सिजन पुरवठ्याची सोय नसलेल्या १३,१४,६४६ खाटा उपलब्ध आहेत.आॅक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या २,३१,०९३ खाटा, अतिदक्षता विभागांतील ६२,७१७ खाटा तसेच ३२,५७५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.मृत्यूचे प्रमाण जगात सर्वांत कमी : डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, दर १० लाख लोकांमागे कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ३,३२८ व ५५ इतकेकमी राखण्यात भारताला यश आले आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे सर्वांत कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्णांची संख्या व बळी यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, आसाम, ओडिशा, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये आहे.सुरुवातीला देशात पीपीई बनण्याचे प्रमाण अगदीच कमी होते. मात्र आता या साधनांच्या निर्मितीबाबत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.- डॉ. हर्ष वर्धन,केंद्रीय आरोग्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद