शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

प्रसार भारतीच्या सीईओपदासाठी लॉबिंग!

By admin | Updated: October 5, 2016 04:19 IST

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी राजीनामा देताच या पदासाठी आता लॉबिंग सुरू झाली आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी राजीनामा देताच या पदासाठी आता लॉबिंग सुरू झाली आहे. कार्यकाळ संपण्याच्या चार महिने अगोदरच सरकार यांनी राजीनामा दिला आहे. जवाहर सरकार यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आला नसला तरी या पदासाठी एव्हाना लॉबिंग सुरू झाले आहे. जवाहर सरकार यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत या पदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. चार महिने अगोदरच राजीनामा का दिला?जवाहर सरकार यांचा अडीच वर्षांपासून तसा विद्यमान सरकारशी संघर्ष सुरूहोता. अर्थात संस्थेच्या स्वायत्ततेच्या संरक्षणासाठी प्रसार भारतीच्या सीईओंचा हा संघर्ष सुरू होता. तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी आणि मनीष तिवारी यांच्याशी जसा जवाहर सरकार यांनी संघर्ष केला तसाच तो विद्यमान सरकारच्या मंत्र्यांसोबतही केला. जवाहर सरकार यांनी स्पष्ट केले होते की, संस्थेच्या स्वायत्ततेबाबत कदापि तडजोड करणार नाही आणि राजकीय हस्तक्षेपाला परवानगीही देणार नाही. प्रसार भारतीला एक यशस्वी संस्था म्हणून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ते करीत आलेले आहेत. माहिती आणि प्रसारण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकार्यकारी अध्यक्ष सूर्य प्रकाश यांना नियमित नियुक्ती होईपर्यंत सीईओचा पदभार स्वीकारण्यास सांगितले जाऊ शकते. सरकारच्या निकटवर्तीयांपैकी ते एक समजले जातात, तर माहिती व प्रसारण विभागाचे माजी सचिव सुनील अरोरा यांना सीईओपदासाठी प्रसार भारतीकडून विचारणा होऊ शकते. ते सध्या सल्लागार आहेत, तसेच अनुभवी अधिकारी आहेत. नियमित पदावरही त्यांची नियुक्ती होऊ शकते. उपराष्ट्रपती आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती या महत्त्वाच्या पदासाठी नियुक्ती करते.