शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रसार भारतीच्या सीईओपदासाठी लॉबिंग!

By admin | Updated: October 5, 2016 04:19 IST

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी राजीनामा देताच या पदासाठी आता लॉबिंग सुरू झाली आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी राजीनामा देताच या पदासाठी आता लॉबिंग सुरू झाली आहे. कार्यकाळ संपण्याच्या चार महिने अगोदरच सरकार यांनी राजीनामा दिला आहे. जवाहर सरकार यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आला नसला तरी या पदासाठी एव्हाना लॉबिंग सुरू झाले आहे. जवाहर सरकार यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत या पदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. चार महिने अगोदरच राजीनामा का दिला?जवाहर सरकार यांचा अडीच वर्षांपासून तसा विद्यमान सरकारशी संघर्ष सुरूहोता. अर्थात संस्थेच्या स्वायत्ततेच्या संरक्षणासाठी प्रसार भारतीच्या सीईओंचा हा संघर्ष सुरू होता. तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी आणि मनीष तिवारी यांच्याशी जसा जवाहर सरकार यांनी संघर्ष केला तसाच तो विद्यमान सरकारच्या मंत्र्यांसोबतही केला. जवाहर सरकार यांनी स्पष्ट केले होते की, संस्थेच्या स्वायत्ततेबाबत कदापि तडजोड करणार नाही आणि राजकीय हस्तक्षेपाला परवानगीही देणार नाही. प्रसार भारतीला एक यशस्वी संस्था म्हणून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही ते करीत आलेले आहेत. माहिती आणि प्रसारण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकार्यकारी अध्यक्ष सूर्य प्रकाश यांना नियमित नियुक्ती होईपर्यंत सीईओचा पदभार स्वीकारण्यास सांगितले जाऊ शकते. सरकारच्या निकटवर्तीयांपैकी ते एक समजले जातात, तर माहिती व प्रसारण विभागाचे माजी सचिव सुनील अरोरा यांना सीईओपदासाठी प्रसार भारतीकडून विचारणा होऊ शकते. ते सध्या सल्लागार आहेत, तसेच अनुभवी अधिकारी आहेत. नियमित पदावरही त्यांची नियुक्ती होऊ शकते. उपराष्ट्रपती आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती या महत्त्वाच्या पदासाठी नियुक्ती करते.