शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Live - काँग्रेसचा दोन राज्यात पराभव, भाजप एका राज्यात विजयी

By admin | Updated: May 19, 2016 14:26 IST

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, निकालाचे चित्र आता ब-यापैकी स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, निकालाचे चित्र आता ब-यापैकी स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले आहे. २०११ च्या तुलनेत त्यांच्या पक्षाला २१० पेक्षा जास्त जागा मिळतील असे चित्र आहे. त्यांना रोखण्यासाठी डावे आणि काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र डाव्यांचा पार धुव्वा उडाला आहे. काँग्रेस आपल्या जागा कायम राखण्यात ब-यापैकी यशस्वी ठरली आहे. 
 
ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये प्रथमच भाजपचे कमळ उमलणार आहे. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपला ७५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी आहे. काँग्रेसचे मागच्या पंधरावर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले आहे.
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा अम्मा राज येताना दिसत आहे. तामिळनाडूत सत्तांतर होईल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलनी वर्तवला होता. मात्र इथे जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि द्रमुक आघाडीने मागच्यावेळपेक्षा यावेळी कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र सत्तेपासून ते दूर आहेत. 
 
केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे डाव्याच्या एलडीएफ आघाडीने बाजी मारली आहे. १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीला ५० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. 
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यात भाजप सत्तेच्या शर्यतीत नसनूही भाजपने इथे जोरदार प्रचार केला होता. या राज्यांमध्ये पक्ष विस्तार भाजपचे उद्दिष्टय आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदर्शन निराशाजनक राहीले आहे.