शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

Live - काँग्रेसचा दोन राज्यात पराभव, भाजप एका राज्यात विजयी

By admin | Updated: May 19, 2016 14:26 IST

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, निकालाचे चित्र आता ब-यापैकी स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, निकालाचे चित्र आता ब-यापैकी स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले आहे. २०११ च्या तुलनेत त्यांच्या पक्षाला २१० पेक्षा जास्त जागा मिळतील असे चित्र आहे. त्यांना रोखण्यासाठी डावे आणि काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र डाव्यांचा पार धुव्वा उडाला आहे. काँग्रेस आपल्या जागा कायम राखण्यात ब-यापैकी यशस्वी ठरली आहे. 
 
ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये प्रथमच भाजपचे कमळ उमलणार आहे. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपला ७५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी आहे. काँग्रेसचे मागच्या पंधरावर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले आहे.
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा अम्मा राज येताना दिसत आहे. तामिळनाडूत सत्तांतर होईल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलनी वर्तवला होता. मात्र इथे जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि द्रमुक आघाडीने मागच्यावेळपेक्षा यावेळी कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र सत्तेपासून ते दूर आहेत. 
 
केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे डाव्याच्या एलडीएफ आघाडीने बाजी मारली आहे. १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीला ५० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. 
 
तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यात भाजप सत्तेच्या शर्यतीत नसनूही भाजपने इथे जोरदार प्रचार केला होता. या राज्यांमध्ये पक्ष विस्तार भाजपचे उद्दिष्टय आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदर्शन निराशाजनक राहीले आहे.