शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

भागवतांच्या भाषणाचे थेट प्रसारण वादात

By admin | Updated: October 4, 2014 02:55 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर येथील भाषणाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण झाल्यामुळे वाद उफाळला असून, विरोधी पक्ष सरकारवर कडाडून टीका करीत आहेत.

नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर येथील भाषणाचे दूरदर्शनवर थेट प्रसारण झाल्यामुळे वाद उफाळला असून, विरोधी पक्ष सरकारवर कडाडून टीका करीत आहेत. सरकारी वाहिनीचा सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर केला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे, तर भाजपा आपल्या कृतीचे समर्थन करीत आहे. 
 भागवत यांच्या तासाभराच्या भाषणाचे प्रसारण ही घातक परंपरा आहे. आरएसएस ही वादग्रस्त संघटना असून, तिच्या प्रमुखाचे भाषण प्रसारित करण्याचा सरकारचा हा निर्णय राजकीय असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ता संदीप दीक्षित यांनी केला. यापुढे देशाचे नियंत्रण नागपूरहून होईल, अशी भीती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केली. फॉर नागपूर, बाय नागपूर आणि ऑफ नागपूर असा अधिकृत मीडिया असेल़ या घटनेने भाजपाचा खरा रिमोट कंट्रोल कोण आहे हे समोर आले, असे सिंघवी म्हणाले. सरकारी यंत्रणोचा गैरवापर करण्याच्या या कृतीस विरोध केला पाहिजे, असे रशिद अल्वी म्हणाले. आरएसएसच्या राष्ट्रीयत्वाचे रेकॉर्ड आमच्या राष्ट्रीय भावनेपेक्षा वरचढ असल्याचे आम्ही मान्य करणार नाही, असे माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद म्हणाले. 
 आरएसएसने या प्रसंगाचा वापर आपले हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान प्रसिद्ध करण्यास केला़ आरएसएससारख्या संघटनेच्या प्रमुखाचे भाषण थेट प्रसारित करण्याचा उद्योग दूरदर्शनने करायला नको होता, असे भाकपाचे सरचिटणीस डी. राजा म्हणाले.  ही परंपरा अस्वस्थ व बेचैन करणारी आह़े यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रतिमेला धक्का बसला आहे, असे त्यांनी सांगितले. 
हा सरकारी यंत्रणोचा गैरवापर असल्याचे जद (सं) प्रवक्ता के.सी. त्यागी म्हणाले, भविष्यात माहिती व प्रसारण मंत्रलयाने अशा घटनांचे प्रसारण न करण्याचे भान बाळगावे असे त्यानी म्हटले आहे. इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. आरएसएस ही हिंदू संघटना आहे, आता मशिदीचे इमाम व चर्चचे बिशपही त्यांची भाषणो थेट प्रसारीत करण्याची मागणी करतील , असे गुहा यांनी आपल्या ट¦ीटमध्ये म्हटले आहे. 
भागवत काय बोलतात हे लोकांना ऐकायचे असते , असे भाजपा प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी 
म्हटले आहे, प्रसार भारती ही 
स्वतंत्र संघटना आहे, कोणती 
बातमी प्रसारीत करायची याचा निर्णय घेण्याचा तिला अधिकार आहे 
असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस व 
डावे पक्ष नसलेल्या मुद्यावर रान उठवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप लेखी यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
आमच्यासाठी ती इतर कोणत्याही बातमीप्रमाणो एक बातमी होती, आम्ही ती प्रसारित केली. त्यासाठी कोणतीही विशेष तयारी करण्यात आली नव्हती. 
-अर्चना दत्त, वृत्तसंचालक, दूरदर्शन
 
खरेतर इतकी वर्षे सरसंघचालकांच्या भाषणाचे थेट प्रसारण दूरदर्शनने का केले नाही, असा प्रश्न विचारायला हवा. दूरदर्शनला काँग्रेस सरकारने जोखडात ठेवले होते म्हणूनच असे झाले होते. आता तसे बंधन नाही. 
-प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री, 
माहिती व प्रसारण
 
त्यांची हुकूमत आहे, त्यांचेच ऐकावे लागणार
सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपुरातील भाषण दूरदर्शनने लाइव्ह टेलीकास्ट केल़े कारण आता त्यांची हुकूमत आह़े आता त्यांचेच ऐकावे लागणार.-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस