शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

उमेदवारीसाठी साक्षरतेची अट वैध

By admin | Updated: December 11, 2015 02:34 IST

पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारा हरियाणा सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

नवी दिल्ली : पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारा हरियाणा सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा वैध ठरल्याने पंचायत निवडणुकांमध्ये फक्त साक्षरांनाच उमेदवारीस पात्र ठरविण्याची अट घालण्याचा मार्ग इतर राज्यांसाठीही मोकळा झाला आहे. या कायद्याविरुद्ध दाखल याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायमूर्तीद्वय जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे यांच्या पीठाने स्पष्ट केले. या याचिकेत हरियाणाच्या पंचायतराज दुरुस्ती कायदा २०१५ ला आव्हान देण्यात आले होते. या कायद्यात निवडणूक लढविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान १० वी उत्तीर्ण तसेच महिला (सर्वसाधारण गट) व अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आठवी उत्तीर्ण असणे सक्तीचे करण्यात आले आहे. सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांना पाचवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. (वृत्तसंस्था)> काय होणार?निम्मी लोकसंख्या निरक्षर असल्याने निवडणूक लढविण्यापासून वंचित.न्यायालयाच्या निकालाने भाजपाला नैतिक बळ.हरियाणापाठोपाठ राजस्थान सरकारनेही असा कायदा केला आहे. त्याचाही मार्ग या निकालाने अप्रत्यक्षपणे मोकळा झाला.