शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी साक्षरतेची अट वैध

By admin | Updated: December 11, 2015 02:34 IST

पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारा हरियाणा सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

नवी दिल्ली : पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालणारा हरियाणा सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा वैध ठरल्याने पंचायत निवडणुकांमध्ये फक्त साक्षरांनाच उमेदवारीस पात्र ठरविण्याची अट घालण्याचा मार्ग इतर राज्यांसाठीही मोकळा झाला आहे. या कायद्याविरुद्ध दाखल याचिका फेटाळण्यात येत असल्याचे न्यायमूर्तीद्वय जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे यांच्या पीठाने स्पष्ट केले. या याचिकेत हरियाणाच्या पंचायतराज दुरुस्ती कायदा २०१५ ला आव्हान देण्यात आले होते. या कायद्यात निवडणूक लढविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान १० वी उत्तीर्ण तसेच महिला (सर्वसाधारण गट) व अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आठवी उत्तीर्ण असणे सक्तीचे करण्यात आले आहे. सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांना पाचवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. (वृत्तसंस्था)> काय होणार?निम्मी लोकसंख्या निरक्षर असल्याने निवडणूक लढविण्यापासून वंचित.न्यायालयाच्या निकालाने भाजपाला नैतिक बळ.हरियाणापाठोपाठ राजस्थान सरकारनेही असा कायदा केला आहे. त्याचाही मार्ग या निकालाने अप्रत्यक्षपणे मोकळा झाला.