शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

हैदराबादमधील दलित विद्यार्थी रोहीत वेमुलाचं आत्महत्येपूर्वीच पत्र

By admin | Updated: January 19, 2016 16:25 IST

रोहीत वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने हैदराबाद विद्यापीठातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या विद्यापीठात दलितांना हीन वागणूक मिळत असल्याचे आरोप होत आहेत

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १९ - रोहीत वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने हैदराबाद विद्यापीठातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या विद्यापीठात दलितांना हीन वागणूक मिळत असल्याचे आरोप होत आहेत. त्याखेरीज अभाविपच्या माध्यमातून भाजपा हिंदुत्ववादी अजेंडा राबवत असल्याचा आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांची गळचेपी करत असल्याचे आरोप होत आहेत. रोहीत वेमुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले कथित पत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलं असून, त्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे:
 
सुप्रभात,
 
ज्यावेळी तुम्ही हे पत्र वाचत असाल, त्यावेळी मी तुमच्यासोबत नसेन. माझ्यावर रागाऊ नका. मला माहित्येय तुमच्यापैकी काहीजणांनी माझी खरंच काळजी घेतली. माझी कुणाबाबतही तक्रार नाही. मला माझ्या स्वत:बद्दलच समस्या होत्या. मला वाटतं माझा आत्मा आणि शरीर यांच्यात दरी वाढत होती, आणि मी दैत्य झालो आहे. मला लेखक व्हायचं होतं. विज्ञानाचा लेखक, कार्ल सेजनप्रमाणे. आणि अखेर, मी हे एकच पत्र मी लिहू शकतोय. 
मला विज्ञान, तारे, निसर्ग आवडायचे. तसंच मी लोकांवरही प्रेम करायचो. पण मला कळलं नव्हतं की, लोकांनी केव्हाच निसर्गापासून फारकत घेतलेली आहे. आपलं प्रेम कृत्रिम झालंय. आपल्या श्रद्धांना रंग चढलेत. कृत्रिम कलेद्वारे आपलं सत्यरुप जोखलं जातं. दु:खी न होता, प्रेम करणं हे खूपच कठीण होऊन बसलंय. 
माणसाचं मूल्य हे त्याची ओळख व नजीकची शक्यता इतक्या कालच्या पातळीवर आली आहे. एका मताएवढी, एका आकड्याएवढी किंवा अशाच एका गोष्टीएवढी. माणसाकडे एक मन या दृष्टीने बघितलं गेलंच नाही. प्रत्येक क्षेत्रात, मग ते शिक्षणाचे असो, रस्त्यावर असो, राजकारण असो किंवा अगदी मरण व जगणं असो.
मी या प्रकारचं पत्र पहिल्यांदाच लिहितोय. शेवटच्या पत्राची पहिली वेळ. जर मी तर्क नीट मांडत नसेन तर मला माफ करा.
शक्य आहे की, हे जग संजून घेण्यात मी चूक केली. प्रेम, दु:ख, जीवन व मरण समजण्यात मी कमी पडलो. कसलीही कधी घाई नव्हती. पण मी कायम घाई करत राहिलो. जीवन सुरू करण्यासाठी अत्यंत उतावीळ झालो. काही लोकांसाठी जीवन हाच एक शाप आहे. माझा जन्म हाच एक अपघात आहे. लहानपणाच्या एकाकीपणापासून मी कधीच उभारी घेऊ शकलो नाही. माझ्या भूतकाळातलं दुर्लक्षित पोर.
या क्षणी मी दुखावलो गेलेलो नाही, मी दु:खीही नाही. मी केवळ रीता आहे. स्वत:बद्दल काही घेणंदेणंच नसलेला. हे फारच वाईट आहे आणि त्यामुळेच मी हे पाऊल उचलतोय.
माझी संभावना लोक भित्रा अशी करतिल. मी गेल्यावर कदाचित स्वार्थी किंवा मूर्खही म्हणतील. माझा मरणोत्तर कथांवर, आत्म्यांच्या कथांवर किंवा भूताखेतांवर विश्वासही नाहीये. जर माझा कशावर विश्वास असेल तर यावर आहे की मी ता-यांपर्यंत पोहोचू शकतो आणि दुस-या जगाबद्दल जाणू शकतो. 
जर तुम्ही हे पत्र वाचत असताना माझ्यासाठी काही करू शकत असाल, तर मला सात महिन्यांची फेलोशिप मिळायची बाकी आहे जी, एक लाख ७५ हजार रुपये होते. मी रामजीचं ४० हजार रुपयांच्या आसपास देणं लागतो. त्यांनी ते कधी मागितले नाहीत, परंतु कृपया ते त्यांना द्यावेत.
माझा अंत्यविधी शांततेत व सुरळित व्हावा. असं वागा, जसा की मी आलो आणि गेलो. माझ्यासाठी अश्रू वाहू नका. लक्षात घ्या की जगण्यापेक्षा मला मरणात सुख आहे. 'सावलीपासून ते ता-यांपर्यंत'
उमा अण्णा, या गोष्टीसाठी तुमची खोली वापरल्याबद्दल माफ करा. ASA च्या कुटुंबातील सदस्यांनो, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलंत, परंतु तुम्हाला निराश केल्याबद्दल माफ करा. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
 
अखेरचा एकदा
 
जय भीम
 
मी उपाचाराचं लिहायला विसरलोच... माझ्या आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नाहीये.