शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील २५० मुलांचे मोफत शिक्षण उपसचिवांचे पत्र : सातार्‍याच्या जनता शिक्षण संस्थेचा पुढाकार

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

जळगाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्‘ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा लाभ द्यावा अशी सूचना उपसचिवांनी जिल्हा प्रशासला पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

जळगाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्‘ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा लाभ द्यावा अशी सूचना उपसचिवांनी जिल्हा प्रशासला पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
जनता शिक्षण संस्थेेचे मुख्य सचिवांना पत्र
सातारा येथील जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र पाठविले आहे. त्यात महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याबाबत मदत करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
२५० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व बी.सी.ए. अशा चार ज्ञानशाखांमार्फत तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रामार्फत शिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी ११ वी ते एमए, एम.कॉम व एम.एस्सी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व जातीधर्माच्या २५० गरजू विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष या महाविद्यालयात मोफत शिक्षण देण्यासाठी संस्थेेने पुढाकार घेतला आहे.
वसतीगृहात राहण्याची व्यवस्था मोफत
या महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार्‍या २५० विद्यार्थ्यांच्या चहापाणी, नास्ता, भोजन, पुस्तके, गणवेश, वैद्यकीय तपासणी तसेच राहण्याची व्यवस्था संस्थेतर्फे मोफत करण्यात येणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व वर्तणूकीच्या दाखल्यासह संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
उपसचिवांनी केली जिल्हा प्रशासनाला सूचना
जनता शिक्षण संस्थेतर्फे मदतीसाठी पुढाकार घेण्यात आल्यानंतर मुख्य सचिवांनी याबाबत सर्व जिल्हाधिकार्‍यांना आपल्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे याबाबत आदेश काढले आहे. त्यानुसार महसूल व वनविभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला पाठवून त्याबाबतचा अहवाल मागविला आहे.