शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील २५० मुलांचे मोफत शिक्षण उपसचिवांचे पत्र : सातार्‍याच्या जनता शिक्षण संस्थेचा पुढाकार

By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST

जळगाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्‘ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा लाभ द्यावा अशी सूचना उपसचिवांनी जिल्हा प्रशासला पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

जळगाव : नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील २५० मुलांच्या मोफत शिक्षणासाठी जनता शिक्षण संस्था, वाई, जि.सातारा यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्‘ातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन या उपक्रमाचा लाभ द्यावा अशी सूचना उपसचिवांनी जिल्हा प्रशासला पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
जनता शिक्षण संस्थेेचे मुख्य सचिवांना पत्र
सातारा येथील जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र पाठविले आहे. त्यात महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याबाबत मदत करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
२५० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व बी.सी.ए. अशा चार ज्ञानशाखांमार्फत तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रामार्फत शिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी ११ वी ते एमए, एम.कॉम व एम.एस्सी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व जातीधर्माच्या २५० गरजू विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष या महाविद्यालयात मोफत शिक्षण देण्यासाठी संस्थेेने पुढाकार घेतला आहे.
वसतीगृहात राहण्याची व्यवस्था मोफत
या महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार्‍या २५० विद्यार्थ्यांच्या चहापाणी, नास्ता, भोजन, पुस्तके, गणवेश, वैद्यकीय तपासणी तसेच राहण्याची व्यवस्था संस्थेतर्फे मोफत करण्यात येणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती व वर्तणूकीच्या दाखल्यासह संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
उपसचिवांनी केली जिल्हा प्रशासनाला सूचना
जनता शिक्षण संस्थेतर्फे मदतीसाठी पुढाकार घेण्यात आल्यानंतर मुख्य सचिवांनी याबाबत सर्व जिल्हाधिकार्‍यांना आपल्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे याबाबत आदेश काढले आहे. त्यानुसार महसूल व वनविभागाचे उपसचिव अशोक आत्राम यांनी लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला पाठवून त्याबाबतचा अहवाल मागविला आहे.