शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

चला, तिकीट-तिकीट खेळू या

By admin | Updated: September 18, 2015 02:33 IST

राजकारणात निवडणुकीच्या तिकिटावरून होणारे वाद अथवा भांडणे आजवर सर्वांनी अनेकदा पाहिली. तथापि, दिवंगत नेत्यांच्या स्मृतीनिमित्त प्रकाशित टपालाच्या

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

राजकारणात निवडणुकीच्या तिकिटावरून होणारे वाद अथवा भांडणे आजवर सर्वांनी अनेकदा पाहिली. तथापि, दिवंगत नेत्यांच्या स्मृतीनिमित्त प्रकाशित टपालाच्या तिकिटावरून दोन राष्ट्रीय पक्षांमधे रंगलेला जाहीर वाद देशाच्या राजधानीत प्रथमच रंगला आहे.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या सन्मानार्थ पूर्वी प्रकाशित झालेली टपाल तिकिटे रद्द करण्याच्या सरकारी निर्णयाचे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी जाहीर समर्थन केले. त्यामागील तर्क देताना प्रसाद म्हणाले, की आमचे सरकार कोणतीही विशिष्ट विचारसरणीचे अथवा व्यक्तींचे पूजक नाही. राष्ट्रनिर्मितीत ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्या सर्वांच्या नावाची टपाल तिकिटे आम्ही प्रकाशित करणार आहोत. यापूर्वी एकाच कुटुंबातील व्यक्तींची टपाल तिकिटे वारंवार का प्रकाशित केली गेली? याचे उत्तर काँग्रेसनेच देशाला द्यावे. आमचे सरकार राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, तिलका मांझी, विद्यापती, मिथिला पेंटिंग, खुदिराम बोस, सुभाषचंद्र बोस, ईश्वरचंद्र विद्यासागर, मुन्शी प्रेमचंद, दीनदयाळ उपाध्याय, अशफाकउल्ला खान, रवींद्रनाथ टागोर, मौलाना आझाद, बिसमिल्ला खान, राममनोहर लोहिया, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदर तेरेसा, राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, महाराणा प्रताप यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी नजीकच्या काळात डाक तिकिटे जारी करणार आहे. रविशंकर प्रसाद यांच्या या तर्काला ठोस उत्तर देत गुरूवारच्या वार्तालापात प्रवक्ते रणजीत सुरजेवाला म्हणाले, राष्ट्रनिर्मितीत एकतर भाजपला दावा करता येईल असे या पक्षाचे विशेष योगदान नाही. केवळ काँग्रेसच्या आकसापोटी सपशेल खोटी विधाने करून मंत्रीमहोदय देशाची फसवणूक करीत आहेत. काँग्रेसने कोणत्याही काळात विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार केला नाही की केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तिंची डाक तिकिटे प्रकाशित केली नाहीत. उलटपक्षी आपल्या राजकीय विरोधकांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा काँग्रेसनेच देशात रूजवली आहे. आपल्या निवेदनाच्या पुष्ठ्यर्थ काँग्रेस सरकारच्या सत्तेच्या कालखंडात भारत सरकारतर्फे कोणत्या राष्ट्रनेत्यांची डाक तिकीटे जारी करण्यात आली, त्याची १९४८ पासून २00९ पर्यंतची लांबलचक नावांसह यादीच सुरजेवालांनी वार्तालापात जारी केली. त्यात महात्मा गांधी, (१९४८)लोकमान्य टिळक (१९५६), मदनमोहन मालवीय (१९६१), सुभाषचंद्र बोस(१९६४), सरदार पटेल (१९६५), डॉ.आंबेडकर(१९६७), महाराणा प्रताप(१९६७), स्वातंत्र्यवीर सावरकर(१९७0), लेनीन(१९७0), जयप्रकाश नारायण(१९७९), शिख नेते बाबा जस्सासिंग अहलुवालिया (१९८५), मास्टर तारासिंग(१९८५), शेख अब्दुल्ला (१९८८), राजनारायण(२00५), मदर तेरेसा, जे.आर.डी.टाटा(२00८) , रामस्वामी पेरियार(२00९), डॉ.सी.व्ही.रामन (२00९) इत्यादी प्रमुख नावे आहेत. संचार मंत्री प्रसाद यांनी जाहीर केलेल्या यादीत यापैकी काही नावांची पुनरावृत्ती झालेली दिसते आहे. जगाच्या पाठीवर बल्गेरिया, सोव्हिएत रशिया, लाओस, जर्मनी, श्रीलंका, बुरंडी सारख्या अनेक लहान-मोठया देशांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची टपाल तिकिटे प्रकाशित केली आहेत. आपले अस्वस्थ संचारमंत्री त्यांनाही ती बंद करायला सांगणार काय? असा सवालही सुरजेवालांनी विचारला आहे.- काँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला म्हणाले, की स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, राजनारायण यांसारख्या आपल्या राजकीय विरोधकांची टपाल तिकिटे तर काँग्रेसने जारी केलीच, याखेरीज वाजपेयी सरकारने आपल्या कार्यकालात संघाचे संस्थापक हेडगेवार, नंबुद्रीपाद, आदींची तिकिटे प्रकाशित केली. त्यानंतर काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत ती रद्द करण्याचे पाप कधी केले नाही.