शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चला, तिकीट-तिकीट खेळू या

By admin | Updated: September 18, 2015 02:33 IST

राजकारणात निवडणुकीच्या तिकिटावरून होणारे वाद अथवा भांडणे आजवर सर्वांनी अनेकदा पाहिली. तथापि, दिवंगत नेत्यांच्या स्मृतीनिमित्त प्रकाशित टपालाच्या

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

राजकारणात निवडणुकीच्या तिकिटावरून होणारे वाद अथवा भांडणे आजवर सर्वांनी अनेकदा पाहिली. तथापि, दिवंगत नेत्यांच्या स्मृतीनिमित्त प्रकाशित टपालाच्या तिकिटावरून दोन राष्ट्रीय पक्षांमधे रंगलेला जाहीर वाद देशाच्या राजधानीत प्रथमच रंगला आहे.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या सन्मानार्थ पूर्वी प्रकाशित झालेली टपाल तिकिटे रद्द करण्याच्या सरकारी निर्णयाचे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी जाहीर समर्थन केले. त्यामागील तर्क देताना प्रसाद म्हणाले, की आमचे सरकार कोणतीही विशिष्ट विचारसरणीचे अथवा व्यक्तींचे पूजक नाही. राष्ट्रनिर्मितीत ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्या सर्वांच्या नावाची टपाल तिकिटे आम्ही प्रकाशित करणार आहोत. यापूर्वी एकाच कुटुंबातील व्यक्तींची टपाल तिकिटे वारंवार का प्रकाशित केली गेली? याचे उत्तर काँग्रेसनेच देशाला द्यावे. आमचे सरकार राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, तिलका मांझी, विद्यापती, मिथिला पेंटिंग, खुदिराम बोस, सुभाषचंद्र बोस, ईश्वरचंद्र विद्यासागर, मुन्शी प्रेमचंद, दीनदयाळ उपाध्याय, अशफाकउल्ला खान, रवींद्रनाथ टागोर, मौलाना आझाद, बिसमिल्ला खान, राममनोहर लोहिया, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदर तेरेसा, राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, महाराणा प्रताप यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी नजीकच्या काळात डाक तिकिटे जारी करणार आहे. रविशंकर प्रसाद यांच्या या तर्काला ठोस उत्तर देत गुरूवारच्या वार्तालापात प्रवक्ते रणजीत सुरजेवाला म्हणाले, राष्ट्रनिर्मितीत एकतर भाजपला दावा करता येईल असे या पक्षाचे विशेष योगदान नाही. केवळ काँग्रेसच्या आकसापोटी सपशेल खोटी विधाने करून मंत्रीमहोदय देशाची फसवणूक करीत आहेत. काँग्रेसने कोणत्याही काळात विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार केला नाही की केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तिंची डाक तिकिटे प्रकाशित केली नाहीत. उलटपक्षी आपल्या राजकीय विरोधकांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा काँग्रेसनेच देशात रूजवली आहे. आपल्या निवेदनाच्या पुष्ठ्यर्थ काँग्रेस सरकारच्या सत्तेच्या कालखंडात भारत सरकारतर्फे कोणत्या राष्ट्रनेत्यांची डाक तिकीटे जारी करण्यात आली, त्याची १९४८ पासून २00९ पर्यंतची लांबलचक नावांसह यादीच सुरजेवालांनी वार्तालापात जारी केली. त्यात महात्मा गांधी, (१९४८)लोकमान्य टिळक (१९५६), मदनमोहन मालवीय (१९६१), सुभाषचंद्र बोस(१९६४), सरदार पटेल (१९६५), डॉ.आंबेडकर(१९६७), महाराणा प्रताप(१९६७), स्वातंत्र्यवीर सावरकर(१९७0), लेनीन(१९७0), जयप्रकाश नारायण(१९७९), शिख नेते बाबा जस्सासिंग अहलुवालिया (१९८५), मास्टर तारासिंग(१९८५), शेख अब्दुल्ला (१९८८), राजनारायण(२00५), मदर तेरेसा, जे.आर.डी.टाटा(२00८) , रामस्वामी पेरियार(२00९), डॉ.सी.व्ही.रामन (२00९) इत्यादी प्रमुख नावे आहेत. संचार मंत्री प्रसाद यांनी जाहीर केलेल्या यादीत यापैकी काही नावांची पुनरावृत्ती झालेली दिसते आहे. जगाच्या पाठीवर बल्गेरिया, सोव्हिएत रशिया, लाओस, जर्मनी, श्रीलंका, बुरंडी सारख्या अनेक लहान-मोठया देशांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची टपाल तिकिटे प्रकाशित केली आहेत. आपले अस्वस्थ संचारमंत्री त्यांनाही ती बंद करायला सांगणार काय? असा सवालही सुरजेवालांनी विचारला आहे.- काँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला म्हणाले, की स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, राजनारायण यांसारख्या आपल्या राजकीय विरोधकांची टपाल तिकिटे तर काँग्रेसने जारी केलीच, याखेरीज वाजपेयी सरकारने आपल्या कार्यकालात संघाचे संस्थापक हेडगेवार, नंबुद्रीपाद, आदींची तिकिटे प्रकाशित केली. त्यानंतर काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत ती रद्द करण्याचे पाप कधी केले नाही.