शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

श्री.चुडामण बोरसे यांच्याकडे द्यावे पोळ्याच्या विशेष पानासाठी आयटेम गोधनाच्या जीवामृताने फुंकले शेतीत प्राण

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

चंद्रकांत जाधव

चंद्रकांत जाधव
देशातील शेतीला साडेदहा हजार वर्षांचा इतिहास आहे. शेतीचे अभ्यासक, जुने जाणते व संशोधक यांच्यानुसार पूर्वीची शेती ही स्थलांतरित होती. म्हणजेच एका ठिकाणी दोन ते तीन वर्षे शेती केली जायची. जमिनीची ताकद कमी झाली की नंतर जंगल कापून दुसर्‍या ठिकाणावर शेती करायला समूहाने लोक जायचे. अजूनही हिमालय आणि स‘ाद्रीत अशा पद्धतीची शेती करतात. पूर्वी शेणखताशिवाय शेती कुणी करीत नसते. खंडीभर गायी (२० गायी) पाळण्याचा प्रघातच होता. शेतात शेणखताचा वापर करणारा भगवान श्रीकृष्ण पहिला व्यक्ती होता, असेही तज्ज्ञांच्या भाषणात, लिखाणात येते. गायींच्या माध्यमातून शेती कसण्यासाठी गोर्‍हे, दूध, गोमुत्र, शेण मिळते. गाय ही शेतकर्‍याचे श्रद्धास्थान आहे. राज्यात खान्देशात निमाली, मराठवाड्यात लाल कंधारी, विदभार्थ गवळाऊ, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार तसेच कांकरेज, गीर आदी जातीच्या गायी आहेत. तर देशात गायींच्या ३६ जाती आहेत. विश्वासराव पाटील, जगन्नाथ धनसिंग पाटील यांच्यासारखे अनेक शेेतकरी विविध जातींच्या गायींचे जतन करीत आहेत. सणासुदीला गायीची आवर्जून दारासमोर पूजा केली जाते, तिला गोडधोड खाऊ घातले जाते. परंतु पुरातन शेती ही आज संयुक्तिक आहे का, हा प्रश्न पडतो. कारण गायींची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. यामागे शेतमजुरी महागणे, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळणारे भाव, शेती करण्याबाबतची युवक, महिलांमधील अनास्था अशी अनेक कारणे आहेत. पण आजही पुरातन शेती करण्याचे धाडस काही शेतकरी करतात. काही शेतकरी आवर्जून शेतात दरवर्षी एकरी ३०, ४० ते ५० बैलगाड्या गायींचे शेणखत टाकतात. यात दरवर्षी एकरी १८ बैलगाड्या गायीचे शेणखत म्हणजेच नऊ टन शेणखत टाकले तर पिकांबाबत अपेक्षित स्थिती निर्माण होते, असा अनुभव शेतकरी सांगतात. नैसर्गिक शेतीच्या प्रणेत्यानुसार एकरी नऊ टन शेणखत टाकायचे असले तर प्रत्येक शेेतकर्‍याकडे १० देशी गायी असायला हव्यात, असा सरळ हिशोब लावता येईल. देशात ४५ कोटी एकर शेती आहे म्हणजेच शेणखत मिळून पिके जोमात यावीत, शेतकर्‍यांना अपेक्षित यश मिळावे यासाठी ४५० कोटी देशी गायी देशात असणे आवश्यक आहे. परंतु देशात आजघडीला फक्त आठ कोटी देशी व इतर गायी आहेत. अनेक शेेतकरी देशी काय इतर गायींचे शेणखत दरवर्षी घेऊ शकत नाहीत.