नवी दिल्ली : भाजपाने दाखवलेल्या दिवास्वप्नांना जनता भुलली आणि म्हणूनच विकासाच्या अनेक योजना मार्गी लावूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 7क् व्या जयंतीप्रीत्यर्थ येथे आयोजित महिला काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या़ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेही यावेळी हजर होत़े.