शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

मलाही सांगायचय संस्थानकालीन घाटाचा विकास व्हावा

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रक

भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रकारची सोय नाही. या घाटावर शहरातील सांडपाणी केरकचरा जाऊन सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. घाणीमुळे घाटाच्या पायर्‍या गाडल्या गेल्या आहेत. संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी गवतही मोठ्या प्रमाणात उगवले आहे. संरक्षक कठड्यांचा अभाव, वीज व्यवस्था, बसण्याचीही या ठिकाणी सोय नाही.
काही वर्षांपूर्वी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविल्याने घाटाला गतवैभव प्राप्त झाले होते. मात्र, शहरातील नागरिक व नगरपलिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा घाटाची दुरवस्था झाली आहे. या घाटावर संरक्षक कठडे, विजेची तसेच बसण्याची सोय केल्यास व घाट स्वच्छ करून, नीरा नदीतून वाहणार्‍या पाण्यात नौका विहाराची सुविधा करून पर्यटनदृष्ट्या चालना दिल्यास अनेक नागरिक, आबालवृद्ध याचा फायदा होणार आहे. यामुळे लोकांची सोय होईल तर नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या संस्थान कालीन घाटाला गतवैभव प्राप्त होणार आहे. मात्र, त्यासाठी पाठपुरावा करून काम करणे गरजेचे आहे, तरच ते शक्य होणार आहे.
ज्ञानेश्वर सावंत-
अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ