शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 04:48 IST

पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही

बंगळुरू : पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही, अशी हमी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. शेतकºयांना दिलासा देण्यास माझ्या सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणुकीपूर्वी शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास दिरंगाई होत असल्याप्रकरणी कुमारस्वामी यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी संघटना आणि प्रगत शेतकºयांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन शेतकºयांना भेडसावणाºया समस्यांवर चर्चा केली. कर्जमाफीबाबत पंधरा दिवसांत निर्णय होईल. कितीही अडचणी येवोत, पंधरा दिवसांत कर्जमाफीच्या निर्णयाची पूर्णत: अंमलबजावणी केली जाईल. आर्थिक शिस्त राखण्यास आमचे सरकार बांधील आहे, तसेच शेतकºयांना वाचविण्याची आमची बांधिलकी आहे, असे कुमारस्वामी यांनी तीन तासांच्या या चर्चेनंतर स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतील, असेही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितले.या बैठकीला उपमुख्यमंत्री परमेश्वर, विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गोविंद कारजोला (भाजप) आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कर्जाच्या रकमेची आकडेमोड केली जात आहे. हजारो कोटींचे कर्ज असले तरी तुम्हाला या आर्थिक संकटातून वाचविण्याची आमच्या सरकारची जबाबदारी आहे. दोन-तीन दिवसांत राष्टÑीयीकृत बँकेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून शेतकºयांना दिलेल्या कर्जाबाबत त्यांच्याकडून माहितीही घेऊ, असेही कुमारस्वामी यांंनी या बैठकीत सांगितले.