शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 04:48 IST

पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही

बंगळुरू : पंधरा दिवसांत शेतक-यांना कर्जमाफी करण्यासंदर्भात केलेला वायदा पूर्ण करण्यास मी बांधील असून, या आश्वासनापासून माघार घेणार नाही, अशी हमी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. शेतकºयांना दिलासा देण्यास माझ्या सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणुकीपूर्वी शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास दिरंगाई होत असल्याप्रकरणी कुमारस्वामी यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी संघटना आणि प्रगत शेतकºयांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन शेतकºयांना भेडसावणाºया समस्यांवर चर्चा केली. कर्जमाफीबाबत पंधरा दिवसांत निर्णय होईल. कितीही अडचणी येवोत, पंधरा दिवसांत कर्जमाफीच्या निर्णयाची पूर्णत: अंमलबजावणी केली जाईल. आर्थिक शिस्त राखण्यास आमचे सरकार बांधील आहे, तसेच शेतकºयांना वाचविण्याची आमची बांधिलकी आहे, असे कुमारस्वामी यांनी तीन तासांच्या या चर्चेनंतर स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करतील, असेही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितले.या बैठकीला उपमुख्यमंत्री परमेश्वर, विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गोविंद कारजोला (भाजप) आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कर्जाच्या रकमेची आकडेमोड केली जात आहे. हजारो कोटींचे कर्ज असले तरी तुम्हाला या आर्थिक संकटातून वाचविण्याची आमच्या सरकारची जबाबदारी आहे. दोन-तीन दिवसांत राष्टÑीयीकृत बँकेच्या प्रतिनिधींची बैठक बोलावून शेतकºयांना दिलेल्या कर्जाबाबत त्यांच्याकडून माहितीही घेऊ, असेही कुमारस्वामी यांंनी या बैठकीत सांगितले.