शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पान ४ कुमठा येथे सरकारी कार्यक्रमावर आमदारांचा बहिष्कार

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

कारवार : मानापमानाच्या नाटकात सरकारी कार्यक्रमावर काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार टाकून निघून गेल्याची घटना कुमठा येथे घडली. पक्षाच्या कार्यक्रमातील आमदारांच्या वर्तनाची चर्चा परिसरात सुरू होती.

कारवार : मानापमानाच्या नाटकात सरकारी कार्यक्रमावर काँग्रेसच्या आमदारांनी बहिष्कार टाकून निघून गेल्याची घटना कुमठा येथे घडली. पक्षाच्या कार्यक्रमातील आमदारांच्या वर्तनाची चर्चा परिसरात सुरू होती.
गरिबांना मोफत तांदूळ देण्याची योजना तसेच महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी रेडिमेड कपडे तयार करण्याच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कुमठा तालुक्यातील हेगडे येथे आयोजित केले होते. या वेळी कुमठ्याच्या आमदार शारदा शे˜ी (काँग्रेस), जिल्हा पालक मंत्री आर.व्ही. देशपांडे आदी उपस्थित होते.
या वेळी आ. शे˜ी जिल्हा पालक मंत्री देशपांडे यांना म्हणाल्या की, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ. रामप्रसाद मनोहर हे कुमठा क्षेत्रात हस्तक्षेप करत आहेत. कुमठा तालुक्यातील कुजळ्ळीचे ग्रामविकास अधिकारी शिवानंद जोयस हे उत्तम कार्य करतात. कुजळ्ळी बरोबर ते तोरसे ग्रमपंचायतीचेही काम पाहत होते. मात्र, कार्यनिर्वाहक अधिकार्‍यांनी एकाएकी त्यांची गोकर्ण ग्रामपंचायतीत बदली आम्हाला न विचारता केली. आम्ही त्यांना बदली न करण्याची विनंती केली होती; परंतु आमच्या विनंतीला काडीचीही किंमत न देता अखेर बदली केली.
या वेळी जिल्हा पालक मंत्री देशपांडे यांनी डॉ. मनोहर यांना ग्रामविकास अधिकार्‍याची नेमणूक पुन्हा तोरसे येथे करा, अशी सूचना केली. मात्र, सर्व ग्रामपंचायतींना अनुकूल होईल अशा ग्राम विकास अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या आहेत, असे प्रत्युत्तर डॉ. मनोहर यांनी दिले. त्यावर देशपांडे म्हणाले की, या भागातील आमदारांच्या मताप्रमाणे चला, त्यांच्या सल्ल्याने अधिकार्‍यांच्या नेमणुका करा. यावर डॉ. मनोहर आ. शे˜ींना म्हणाले की, तुमच्या सूचनेप्रमाणे यापुढे निर्णय घेऊ.
या वेळी शारदा शे˜ींनी हा आपला अपमान समजत आताच्या आता ग्रामविकास अधिकार्‍याच्या बदलीचा (पी.डी.ओ) आदेश जारी करावा असा ह˜ धरला. त्यावर असे लोकांच्यासमोर वागणे बरोबर नव्हे अशी समजूत काढण्याचा प्रयत्न देशपांडेंनी केला. मात्र, बदलीचा आदेश दिला नाही तर आपण व्यासपीठावर बसणार नाही असे म्हणत आमदार तरातरा निघून गेल्या. या वेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमण्णा नाईक, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष एल.व्ही. शानभाग व इतर पक्षनेत्यांनी आमदार शे˜ी यांच्या कारपर्यंत जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या म्हणण्याला किंमत दिली नाही हा राग अनावर झाल्याने आमदार कोणाचेही न एकेता निघून गेल्या.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या आमदार असून पक्षाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने सर्वांसमक्ष काँग्रेसजनांना खजील होण्याची वेळ आल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला होता. (प्रतिनिधी)