शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मंगला एक्सप्रेसला थांबा द्या

By admin | Updated: January 24, 2016 22:20 IST

समस्या : पाच हजार प्रवाशी

समस्या : पाच हजार प्रवाशी
जळगाव : जिल्हाभारतून शहरात नोकरी व कामानिमित्त रोज हजारावर प्रवासी रेल्वेने ये-जा करतात. मात्र सायंकाळी परतीच्या दरम्यान गाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. यासाठी मंगला एक्सप्रेस गाडीला जळगाव स्थानकावर थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.
डाऊन मार्गावर ये जा करणार्‍या प्रवाशांना सायंकाळी ७ वाजेनंतर रात्री ९:२५ वाजेपर्यंत गाडीची वाट बघावी लागत असल्यानग प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उशीराच्या गाडीने जाऊन पुढील गावांच्याप्रवासाठी (खेडगावांसाठी) वाहने उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. यामूळे सायंकाळी ७ ते ९:३०वाजे दरम्यान गाडीची आवश्यकता आहे.
मंगला एक्सप्रेस
सायंकाळी ६:३० ते ७ वाजे दरम्यान जळगाव स्थानकावरुन डाऊन मार्गावर पवन एक्सप्रेस, सुरत -भुसावळ पॅसेंजर व कायामाणी एक्सप्रेस अशा तीन रेल्वे गाड्या आहेत. यातून अनेक प्रवाशी ये जा करतात. मात्र काही नोकरदारांच्या कार्यालयाची वेळ उशीरापर्यंत असल्याने त्यांना या गाड्यांचा फायदा होत नसल्याने त्यांना रात्रीच्या हुतात्मा एक्सप्रेस व सेवाग्राम एक्सप्रेसची वाट पहावी लागते. यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी मंगला एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळण्याची मागणी आहे.
कोकणासाठी कमी गाड्या
शिवाय भुसावळ विभागातूून कोकण व गोवाकडे जाणार्‍या गाड्यांची संख्या कमी आहे. या गाडीला येथे थांबा नसल्याने प्रवाशांना भुसावळ स्थानकावरुन ही गाडी पकडावी लागते परती दरम्यान ही तीच परिस्थिती असल्याने गाडीला थांबा मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून खान्देश रेल्वे प्रवासी मंचतर्फे मध्य रेल्वेचे जी. एम. सुनीलकुमार सूद यांच्याकडे करण्यात आली आहे.
पाच हजार प्रवाशी
जिल्हाभारातून शहरात रोज ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या पाच हजारावर आहे. तर जळगावच्या पास धारकांची संख्या शंभरावर आहे. यामूळे सायंकाळी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होतांना दिसते. त्यात वेळेवर गाडी नसल्याने प्रवाशंमधून नाराजी उमटत असते.
वेळ व पैशांचा खर्च
आवश्यक वेळेवर गाडी उपलब्ध नसल्याने व संबंधीत स्थानकांवरुन खेडेगावांकडे जाण्यासाठी वाहने उपलब्ध नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना इतर वाहनांच्या मदतीनआपला मार्ग निवडावा लागतो यामूळे पैसा व वेळ वाया जातो.

कोट
मंगला एक्सप्रेस संबंधात प्रवासी संघटनांतर्फे स्थानिक स्थरावर मागणी आलेली नाही. वरिष्ठस्तरावर करण्यात आलेल्या मागणीची माहिती आपल्याकडे नाही.
- ए. एस. कुलकर्णी
स्थानक व्यवस्थापक,जळगाव.