शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निम्मीशिक्षा भोगलेल्या कच्च्या कैद्यांना सोडा

By admin | Updated: September 6, 2014 03:20 IST

देशभरातील सर्व कच्च्या कैद्यांना येत्या दोन महिन्यांत जामिनावर सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.

सुप्रीम कोर्टाचा आदेश : खितपत पडलेल्या हजारोंना दिलासा
नवी दिल्ली : आरोप ठेवलेल्या गुन्ह्यासाठी कायद्याने दिल्या जाऊ शकणा:या कमाल शिक्षेच्या निम्म्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या देशभरातील सर्व कच्च्या कैद्यांना येत्या दोन महिन्यांत जामिनावर सोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. यामुळे जामीन न देता आल्याने दीर्घकाळ तुरुंगात खितपत पडलेल्या हजारो कच्च्या कैद्यांना दिलासा मिळेल तसेच न्यायिक सुधारणोच्या दिशेनेही दमदार पाऊल टाकले जाईल.
खटला प्रलंबित असल्याने व जामीन देता न आल्याने कित्येक वर्षे तुरुंगात असलेल्या काही परदेशी नागरिकांनी केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा, न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. मात्र ज्यासाठी जन्मठेप अथवा फाशीही शिक्षा दिली जाऊ शकते, अशा गुन्ह्यांच्या खटल्यांमधील कच्च्या कैद्यांना हा आदेश लागू होणार नाही, असे न्यायालयाने 
स्पष्ट केले.
देशातील तुरुंगात असलेल्या एकूण कैद्यांपैकी 6क् टक्क्यांहून अधिक कैदी हे खटले वेळेवर निकाली न निघाल्याने खितपत पडलेले कच्चे कैदी आहेत़ याविषयी तीव्र चिंता व्यक्त करीत न्यायालयाने म्हटले की, देशभरातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले तीन कोटी फौजदारी खटले निकाली काढण्यासाठी फक्त 16 हजार न्यायाधीश आहेत. म्हणजेच प्रलंबित खटले व न्यायाधीश यांचे भारतातील हे गुणोत्तर जगात सर्वात व्यस्त असे आहे.
निम्म्याहून अधिक शिक्षा भोगून झालेल्या सर्व कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यासाठी न्यायालयाने दोन महिन्यांचा अवधी दिला असून, हे काम ज्यांच्यासमोर खटले प्रलंबित आहेत अशा दंडाधिकारी, मुख्य न्यायदंडाधिकारी व सत्र न्यायाधीशांवर सोपविली आहे. या कनिष्ठ न्यायिक अधिका:यांनी 1 ऑक्टोबरपासून पुढील दोन महिने आपापल्या कार्यक्षेत्रतील तुरुंगांमध्ये जाऊन तेथे निम्म्याहून अधिक शिक्षा भोगलेले कच्चे कैदी कोण आहेत, याचा शोध घ्यायचा आहे व कायद्यानुसार त्यांना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश लगेच तेथेच जारी करायचे आहेत. यासाठी आरोपींचे वकील व सरकारी वकील हजर असणो गरजेचे नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अशा प्रकारे दोन महिन्यांत केलेल्या कामाचा अहवाल न्यायिक अधिका:यांनी ज्या त्या राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या महाप्रबंधकांकडे पाठवावा व महाप्रबंधकांनी आपापल्या राज्याचे अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांकडे पाठवावे, असेही न्यायालयाने सांगितले. अशा प्रकारे आजच्या या आदेशानुसार देशभरात किती कच्च्या कैद्यांची सुटका झाली, याचा आढावा सर्वोच्च न्यायालय 8 डिसेंबरला घेणार आहे.
कायदा केवळ कागदावर
 कोणत्याही आरोपीला कच्च कैदी म्हणून जास्तीत जास्त किती काळ तुरुंगात ठेवता येईल याचे बंधन दंड प्रक्रिया संहितेने घातलेले आहे व ठराविक काळानंतर अशा कच्च्या कैद्यांना सोडण्याची तरतूदही केली आहे. परंतु ब्रिटिशांच्या काळापासून लागू असलेला हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याने आजही ही परिस्थिती उद्भवली आहे. दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 436 ए मध्ये संभाव्य शिक्षेच्या निम्म्याहून अधिका काळ तकुरुंगात असलेल्या कच्च्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता याच कायद्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
अडीच लाख कच्चे कैदी
देशभरातील तुरुंगांमध्ये असलेल्या एकूण सुमारे 
3.81 लाख कैद्यांपैकी 75 टक्क्यांहून अधिक म्हणजे 2.54 लाख कच्चे कैदी असल्याचा अंदाज आहे.
 
यात निम्म्याहून अधिक शिक्षा भोगून झालेले किती कच्चे कैदी असावेत, हे सांगणो मात्र कठीण आहे. 
 
मात्र खटल्यांमध्ये दोषी ठरून जेवढी शिक्षा झाली असती त्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या कच्च्या कैद्यांचीही अनेक प्रकरणो उघड झालेली आहेत.