शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वायुगळती झालेला विशाखापट्टणमचा कारखाना जप्त होणार; आंध्र प्रदेश न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 02:37 IST

कंपनी संचालकांना देश न सोडण्याचे निर्देश, समितीला कारखाना परिसराची पाहणी करण्याची मुभा

अमरावती (आंध्र प्रदेश) : विशाखापट्टणमस्थित एलजी पॉलिमर्स या कारखान्याचा परिसर जप्त करण्याचे आदेश आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ७ मे रोजी या कंपनीत झालेल्या वायुगळतीत बारा जण ठार झाले होते, तर शेकडो लोकांना विषबाधा झाली होती. राज्य सरकारतर्फे नियुक्त समिती वगळता अन्य कोणालाही या कारखान्यात प्रवेश न करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.२२ मे रोजी उच्च न्यायालयाने कारखान्याच्या संचालकांना कोर्टाच्या परवानगीशिवाय भारताबाहेर न जाण्याचे निर्देश दिले होते. त्यांना पासपोर्ट कोर्टाच्या परवानगीशिवाय देऊ नये, असेही कोर्टाने निर्देश दिले आहेत.

वायुगळतीग्रस्त लोकांना न्याय, कारखाना इतरत्र हलविणे आणि दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश जे. के. माहेश्वरी आणि न्या. ललिता कन्नेगंती यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले.

उच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात म्हटले आहे की, कोर्टाच्या परवानगीशिवाय कारखान्याची कोणतीही चल-अचल संपत्ती, यंत्रसामग्री किंवा अन्य वस्तू हलविली जाणार नाही. कारखान्याच्या संचालकांनी जमा केलेले पासपोर्ट कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना देऊ नयेत, तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय संचालकांनी भारताबाहेर जाऊ नये, असे कोर्टाने निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला कारखाना परिसराची पाहणी करण्याची मुभा असेल. तथापि, समितीला कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील नोंदणी पुस्तिकेत निरीक्षण कामासंबंधीचा उल्लेख करावा लागेल. च्याप्रकरणी उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकार यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत, तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून २६ मेच्या आधी उत्तर मागवले आहे.च्या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ मे रोजी ठेवली आहे. वायूगळतीप्रकरणी एलजी पॉलिमर्सच्या पालक कंपनीने याआधीच माफी मागितली आहे.

टॅग्स :Indiaभारत