शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय युवकांचा ‘इसिस’कडे ओढा

By admin | Updated: November 30, 2014 02:16 IST

इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेकडे भारतीय युवक आकर्षित होत असून, इसिसमुळे देशाच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

राजनाथसिंह यांची कबुली : केंद्र सरकार चिंतेत, छळ करण्यासाठी कल्याणच्या तरुणाला अटक केल्याचा इन्कार
गुवाहाटी : सिरिया आणि इराकमध्ये सक्रिय असलेल्या इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेकडे भारतीय युवक आकर्षित होत असून, इसिसमुळे देशाच्या सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. 
गुवाहाटी येथे आयबीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या 49 व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. पाकिस्तानमधील सरकार पुरस्कृत घटक भारताला अस्थिर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राजनाथसिंह यांनी केला. हे घटक विविध क्लृप्त्या लढवून देशाला हानी पोहोचविण्याचे प्रय} करीत आहेत, असे ते म्हणाले. 
इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी इराकला गेलेला कल्याणचा                  एक तरुण शुक्रवारी मुंबईत परतल्याच्या पाश्र्वभूमीवर राजनाथसिंह यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
या दहशतवादी गटाची स्थापना इराक व सिरियामध्ये झाली असली तरी भारतीय उपखंड या समस्येपासून दूर राहू शकत नाही. त्यांच्या कारवाया समजून घेण्याची गरज आहे. काही भारतीय युवक इसिसकडे आकर्षित होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आम्ही त्याकडे आव्हान म्हणून पाहतो, असे राजनाथसिंह म्हणाले. 
इराकमधील इसिसच्या ताब्यात असलेल्या भागात बेपत्ता झाल्यानंतर मुंबईत परतलेल्या आरिफ माजिद याचा छळ करण्यासाठी त्याला अटक केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट      केले. 
भारतीय उपखंडासाठी कायदा-उल-जेहाद नावाने शाखा उघडण्याची अल-कायदाने केलेली घोषणा हा मोठा धोका असल्याचे नमूद करून राजनाथसिंह पुढे म्हणाले, बांगलादेश, आसाम, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि देशाचा अन्य काही भाग आपल्या नियंत्रणाखाली आणणो हा या दहशतवादी संघटनेचा हेतू आहे; पण भारत असे काही होऊ देणार नाही.  (वृत्तसंस्था)
 
भारतीय मुस्लिम देशभक्त आहेत!
च्भारतात मोठय़ा संख्येने मुस्लिम लोक राहतात. त्यांच्यापैकी अनेकांना आपल्या संघटनेत सामील करून इस्लामिक राष्ट्राच्या निर्मितीसाठी लढा दिला जाऊ शकतो, असे अनेक विदेशी दहशतवादी संघटनांना वाटते; परंतु भारतीय मुस्लिम हे सच्चे देशभक्त आहेत. स्वातंत्र्य लढय़ापासून ते आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत आलेले आहेत. 
 
च्भारतीय मुस्लिम नेहमीच देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी लढण्यास तयार असतात आणि त्यामुळेच या दहशतवादी गटांना कधीही यश मिळणार नाही, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
 
गृहमंत्र्यांच्या भाषणादरम्यान सीबीआय संचालकांना लागली डुलकी
च्पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या संमेलनात गृहमंत्री राजनाथसिंग हे दहशतवाद आणि देशाची सुरक्षा या गंभीर विषयावर भाषण देत असताना सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा हे मात्र आपल्या जागेवरच डुलकी घेताना दिसत होते. राजनाथसिंग यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान सिन्हा डुलकी घेताना दिसले. 
 
च्राजनाथसिंग यांचे भाषण पूर्ण झाल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या तेव्हा कुठे सिन्हा जागे झाले. सिन्हा 2 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासापासून दूर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सिन्हा यांना दिले आहेत. आरोपींना मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
 
सिरिया, इराकमध्ये लढून परतणो हे नवे आव्हान..!
गुवाहाटी : भारतीय युवकांचे सिरिया आणि इराकमधील युद्धात भाग घेतल्यानंतर भारतात परत येणो हे देशासाठी नवे आव्हान आहे, असे सांगून पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना देशासाठी नेहमीच धोकादायक असल्याचे मत गुप्तचर विभागाचे (इंटेलिजन्स ब्युरो) संचालक आसिफ इब्राहिम यांनी व्यक्त केले आहे.
गुवाहाटीतील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या 49 व्या वार्षिक संमेलनात इब्राहिम बोलत होते. ते म्हणाले, सिरिया आणि इराक हे दोन्ही देश ‘जिहादी’ हिंसाचाराचा नवा धोका म्हणून समोर आलेले आहेत. युवकांचे या देशांमधील युद्धात सहभाग घेतल्यानंतर परत येणो हे देशासाठी नवे आव्हान आहे. 
कल्याण येथील युवक आरिफ माजिद हा शुक्रवारी इराककडून मुंबईत परतला. एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने त्याला चौकशीनंतर अटक केली आहे. 
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 73 टक्के मतदान झाले. त्याकडे लक्ष वेधून इब्राहिम म्हणाले, लोक तेथील दहशतवादी गटांना नाकारत असल्याचे हे निदर्शक आहे. 2क्14 मधील हिंसाचाराच्या काही किरकोळ घटना वगळल्या तर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी हे जनता दहशतवादी गटांना नाकारत असल्याचेच निदर्शक आहे. राज्यातील लोकांनी लोकशाहीवर विश्वास दाखविला आहे.
जम्मू-काश्मिरात दहशतवादी गटांचा धोका अद्यापही कायमच असल्याने सुरक्षा दलांना अतिसतर्क आणि दक्ष राहण्याची गरज आहे. इंडियन मुजाहिदीनने नवनवे मॉडय़ुल्स तयार केलेले आहेत.  (वृत्तसंस्था)
 
 
सिरिया व इराकमधील ताज्या घडामोडींमुळे त्यांना बळ मिळाले आहे. सुरक्षा दलांच्या सततच्या दबावामुळेच सर्वात हिंसक असलेली भाकपा (माओवादी) ही संघटना संघटनाही समस्यांनी ग्रस्त झालेली आहे. या संघटनेचे कंबरडे मोडण्यासाठी नवे डावपेच आखण्याची वेळ आली आहे, असे इब्राहिम म्हणाले.
ईशान्येकडील राज्यांमधील काही दहशतवादी संघटना मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर राहिल्याकारणाने सुरक्षेची स्थिती नाजूक बनलेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)