शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

नेत्यांच्या घरी जाऊन हेरगिरी होत नाही - अरुण जेटली

By admin | Updated: March 16, 2015 12:36 IST

राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ - राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे. हेरगिरी करायचीच असती तर दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेली नसती, त्यामुळे विरोधकांनी सुरक्षा व्यवस्थेचे राजकारण करु नये असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांची एक पथक गेले होते. राहुल गांधी कसे दिसतात, उंची, डोळ्यांचा, ते कोणते शुज घालतात याविषयीची माहिती पोलिसांनी घेतली होती. या प्रकरणावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसने सोमवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित करुन सत्ताधा-यांवर हेरगिरीचे आरोप केले. चौकशीच्या माध्यमातून सरकार राहुल गांधींची हेरगिरी करत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने यावर संसदेत उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. अखेरीस केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत उत्तर दिले. १९८७ पासून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक अति महत्त्वाच्या व्यक्तींची सखोल माहिती जमा करत असून सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची असते असे अरुण जेटलींनी सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधांनांची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या केली होती त्यावेळी माजी पंतप्रधानांची ओळख त्यांच्या बुटमुळे पटली होती असे जेटलींनी निदर्शनास आणून दिले.  दिल्ली पोलिस ५२६ अति महत्त्वाच्या व्यक्तींची नियमित माहिती घेतात. युपीएसोबतच अटलबिहारी वाजपेयींच्या  नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या  कालावधीतही ही माहिती घेतली जात होते. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी आणि माझीही माहिती दिल्ली पोलिसांनी वेळोवेळी घेतली होती असे जेटलींनी स्पष्ट केले. विरोधक या चौकशीवरुन नाहक गदारोळ घालत आहे असेही त्यांनी नमूद केले.