शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

नेत्यांच्या घरी जाऊन हेरगिरी होत नाही - अरुण जेटली

By admin | Updated: March 16, 2015 12:36 IST

राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ - राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे. हेरगिरी करायचीच असती तर दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेली नसती, त्यामुळे विरोधकांनी सुरक्षा व्यवस्थेचे राजकारण करु नये असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांची एक पथक गेले होते. राहुल गांधी कसे दिसतात, उंची, डोळ्यांचा, ते कोणते शुज घालतात याविषयीची माहिती पोलिसांनी घेतली होती. या प्रकरणावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसने सोमवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित करुन सत्ताधा-यांवर हेरगिरीचे आरोप केले. चौकशीच्या माध्यमातून सरकार राहुल गांधींची हेरगिरी करत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने यावर संसदेत उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. अखेरीस केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत उत्तर दिले. १९८७ पासून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक अति महत्त्वाच्या व्यक्तींची सखोल माहिती जमा करत असून सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची असते असे अरुण जेटलींनी सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधांनांची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या केली होती त्यावेळी माजी पंतप्रधानांची ओळख त्यांच्या बुटमुळे पटली होती असे जेटलींनी निदर्शनास आणून दिले.  दिल्ली पोलिस ५२६ अति महत्त्वाच्या व्यक्तींची नियमित माहिती घेतात. युपीएसोबतच अटलबिहारी वाजपेयींच्या  नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या  कालावधीतही ही माहिती घेतली जात होते. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी आणि माझीही माहिती दिल्ली पोलिसांनी वेळोवेळी घेतली होती असे जेटलींनी स्पष्ट केले. विरोधक या चौकशीवरुन नाहक गदारोळ घालत आहे असेही त्यांनी नमूद केले.