शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

उच्च न्यायालयांत ५० ते ६० न्यायाधीशांच्या नियुक्तीला कायदा मंत्रालयाची मंजुरी

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

उच्च न्यायालयांत ५० ते ६० न्यायाधीशांच्या नियुक्तीला कायदा मंत्रालयाची मंजुरी

उच्च न्यायालयांत ५० ते ६० न्यायाधीशांच्या नियुक्तीला कायदा मंत्रालयाची मंजुरी
नवी दिल्ली : नव्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या (एनजेएसी) वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवरील निर्णयाची प्रतीक्षा असतानाच कायदा मंत्रालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आलेल्या ५० ते ६० नावांना मंजुरी दिली आहे. विद्यमान कॉलेजियम व्यवस्थेअंतर्गत कोणत्याही नव्या नियुक्त्या रोखून ठेवण्यात आलेल्या नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करण्याचा सरकारचा मुळीच हेतू नाही आणि ही भूमिका सरन्यायाधीशांनाही कळविण्यात आलेली आहे, असे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. या संदर्भात पुरविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीवर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी कायदामंत्र्यांनी नुकतीच सरन्यायाधीशांची भेट घेतली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ५० ते ६० नावांना मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु नवी व्यवस्था स्थापन होईपर्यंत विद्यमान कॉलेजियम व्यवस्था कायम राहील. सरन्यायाधीश आणि कॉलेजियम नियुक्तीबाबतचा निर्णय घेण्यास मोकळे आहेत, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
प्रलंबित याचिकांवर निर्णय येईपर्यंत नवी व्यवस्था अमलात आणली जाऊ शकत नाही. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका सवार्ेच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. या रिट याचिका निकाली निघाल्याशिवाय आम्हाला एनजेएसीमार्फत न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा निर्णय कसा काय घेता येऊ शकेल? आयोग स्थापन होईपर्यंत कॉलेजियमची कार्यवाही रोखून धरणे हे आमचे काम नाही, असे मंत्रालयातील या सूत्रांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)