शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

समान नागरी कायद्यावर मागवले विधि आयोगाचे मत

By admin | Updated: July 3, 2016 01:39 IST

मुस्लीम पर्सनल लॉमधील ‘तलाक’चा वादग्रस्त विषय सध्या न्यायप्रविष्ट असून, देशातही समान नागरी कायद्याबाबत सहमतीचे वातावरण नाही. तरीही नरेंद्र मोदी सरकारने विधि आयोगाला

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

मुस्लीम पर्सनल लॉमधील ‘तलाक’चा वादग्रस्त विषय सध्या न्यायप्रविष्ट असून, देशातही समान नागरी कायद्याबाबत सहमतीचे वातावरण नाही. तरीही नरेंद्र मोदी सरकारने विधि आयोगाला समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित सर्व पैलूंचे बारकाईने विश्लेषण करून आपले मत सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटायची शक्यता आहे. केंद्राने अशी विनंती करण्याची स्वातंत्र्यानंतर बहुधा पहिली वेळ आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती बलबीरसिंग चौहान विधि आयोगाचे प्रमुख आहेत. विधि मंत्रालयाने समान नागरी कायद्याबाबत आजवरचे न्यायालयीन निकाल व अन्य दस्तऐवजांची मागणीही आयोगाकडे केली आहे. कायदामंत्री सदानंद गौडा यांनी जानेवारीत, ‘भारतात धर्म अनेक आहेत. प्रत्येकाच्या परंपरा व चालिरिती वेगवेगळ्या आहेत. अनेक प्रकारचे पर्सनल लॉ आहेत. लोकभावना त्याच्याशी संलग्न असल्याने देशात समान नागरी कायदा लागू करण्यास काही काळ लागेल. तथापि देशाच्या ऐक्याचा विचार केल्यास समान नागरी कायद्याचा विचार करावा लागेल,’ असे वक्तव्य केले होते. तज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतरच विधि आयोग आपले मत सरकारकडे सादर करणार आहे. समान नागरी कायद्याची चर्चा अथवा त्यावरचे वादविवाद देशात नवे नाहीत.म्हणजे एकच कायदा! : भारतात सध्या हिंदू आणि मुस्लीम समुदायाला लागू होणारे स्वतंत्र कायदे (पर्सनल लॉ) अस्तित्वात आहेत. त्यात विवाह, संपत्तीची मालकी, उत्तराधिकार, घटस्फोट इत्यादी विषयांचा समावेश होतो. समान नागरी कायदा म्हणजे देशातल्या तमाम धर्मीयांसाठी एकसारखा आणि एकच कायदा.