शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

समान नागरी कायद्यावर मागवले विधि आयोगाचे मत

By admin | Updated: July 3, 2016 01:39 IST

मुस्लीम पर्सनल लॉमधील ‘तलाक’चा वादग्रस्त विषय सध्या न्यायप्रविष्ट असून, देशातही समान नागरी कायद्याबाबत सहमतीचे वातावरण नाही. तरीही नरेंद्र मोदी सरकारने विधि आयोगाला

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

मुस्लीम पर्सनल लॉमधील ‘तलाक’चा वादग्रस्त विषय सध्या न्यायप्रविष्ट असून, देशातही समान नागरी कायद्याबाबत सहमतीचे वातावरण नाही. तरीही नरेंद्र मोदी सरकारने विधि आयोगाला समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित सर्व पैलूंचे बारकाईने विश्लेषण करून आपले मत सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटायची शक्यता आहे. केंद्राने अशी विनंती करण्याची स्वातंत्र्यानंतर बहुधा पहिली वेळ आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती बलबीरसिंग चौहान विधि आयोगाचे प्रमुख आहेत. विधि मंत्रालयाने समान नागरी कायद्याबाबत आजवरचे न्यायालयीन निकाल व अन्य दस्तऐवजांची मागणीही आयोगाकडे केली आहे. कायदामंत्री सदानंद गौडा यांनी जानेवारीत, ‘भारतात धर्म अनेक आहेत. प्रत्येकाच्या परंपरा व चालिरिती वेगवेगळ्या आहेत. अनेक प्रकारचे पर्सनल लॉ आहेत. लोकभावना त्याच्याशी संलग्न असल्याने देशात समान नागरी कायदा लागू करण्यास काही काळ लागेल. तथापि देशाच्या ऐक्याचा विचार केल्यास समान नागरी कायद्याचा विचार करावा लागेल,’ असे वक्तव्य केले होते. तज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतरच विधि आयोग आपले मत सरकारकडे सादर करणार आहे. समान नागरी कायद्याची चर्चा अथवा त्यावरचे वादविवाद देशात नवे नाहीत.म्हणजे एकच कायदा! : भारतात सध्या हिंदू आणि मुस्लीम समुदायाला लागू होणारे स्वतंत्र कायदे (पर्सनल लॉ) अस्तित्वात आहेत. त्यात विवाह, संपत्तीची मालकी, उत्तराधिकार, घटस्फोट इत्यादी विषयांचा समावेश होतो. समान नागरी कायदा म्हणजे देशातल्या तमाम धर्मीयांसाठी एकसारखा आणि एकच कायदा.