शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पंतप्रधानांच्या हस्ते 'श्रमेव जयते' योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: October 16, 2014 13:41 IST

देशातील मजुरांची परिस्थिती सुधारणे व कामगार कायद्यांमध्ये सुधारणा आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'श्रमेव जयते' योजनेचा शुभारंभ केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - देशातील मजुरांची परिस्थिती सुधारणे व कामगार कायद्यांमध्ये सुधारणा आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'पंडित दीनदयाळ उपाध्याय श्रमेव जयते' या योजनेचा शुभारंभ केला. दिल्लीतील विज्ञात भवनात हा सोहळा पार पडला. यावेळी श्रम सुविधा पोर्टल, लेबर इन्स्पेक्शन स्कीम तसेच पीएफसाठी कायमस्वरुपी अकाऊंट नंबरची योजनाही सुरू करण्यात आली. या योजनेचा संघटित व असंघटित क्षेत्रातील लाखो मजुरांना फायदा मिळणार आहे. 
आजपर्यंत आपण फक्त 'सत्यमेव जयते' ऐकत होतो, पण देशाच्या विकासासाठी 'श्रमेव जयतेही' तितकेच महत्वाचे आहे, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. दुर्दैवाने देशात आज केवळ व्हाईट कॉलर लोकांना आदर मिळतो, श्रमिक लोकांना नव्हे. आपल्या अनेक समस्यांचे समाधान श्रमिकांमुळे होते, पण आपण त्यांना समाजात प्रतिष्ठा देत नाही. त्यामुळे  आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहीजे असे सांगत समाजात श्रम करणा-यांचा गौरव करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
जे तांत्रिक शिक्षण घेतात त्यांच्याबाबत आपण हीन भावना निर्माण केली आहे, मात्र तीच दूर करण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन ही योजना सुरू केली आहे. श्रमेव जयते या योजनेचे नेतृत्व याच श्रेत्रातील तज्ज्ञांना दिले आहे. ज्यांनी केवळ आयटीआय (ITI)मधील शिक्षणाच्या जोरावर हजारो लोकांसाठी रोजगार निर्मिती केली त्यांनाच आपण या योजनेसाठी ब्रँड अम्बेसेडर बनवले आहे, असे त्यांनी सांगितले. 
या नव्या सुधारणेअंतर्गत कामगार फंडाची व्याप्ती वाढवण्यात आली असून कामगारांच्या प्रतिमहा किमान वेतनाची मर्यादा १५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच कामगारांना कमीत कमी एक हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल अशी तरतूदही आहे.
तसेच 'इन्स्पेक्टर राज मुक्त' व्यवस्थेकडे पाऊल टाकत देशातील सुमारे १८०० उद्योग निरीक्षकांना पंतप्रधानांकडून नव्या नियमांबाबत थेट संदेश पाठवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.