शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

लातूरला पाणी पोहोचवण्याचे बिल आकारणार नाही - सुरेश प्रभू

By admin | Updated: May 13, 2016 16:58 IST

दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवण्यासाठी आकारण्यात आलेले बिल मागे घेणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवण्यासाठी आकारण्यात आलेले बिल मागे घेणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. मिरजेतून लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले होते. ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते. 
 
'जलपरी'च्या माध्यमातून आतापर्यंत रेल्वेने ६ कोटी २० लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवले आहे. पाण्यासाठी बिल आकारण्याच्या रेल्वेच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी आता बिल मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. 
 
लातूरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून १२ एप्रिलपासून दररोज मिरजेहून ५० रेल्वे वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी पुरवले जात आहे. १२ मे पर्यंत ६ कोटी २० लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी रेल्वेला दररोज १२.५० लाख रुपये खर्च येत आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात या खर्चाचा उल्लेख आहे. 
 
लातूरला रेल्वेने मोफत पाणी देण्याची घोषणा रेल्वेमंत्री प्रभुंनी केली होती. या घोषणेचे स्वागत करत स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी जलपरीवर बॅनर लावून रेल्वेमंत्र्यांचे अभिनंदन केले होते. पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथे पाणी भरल्यानंतर ११ एप्रिलला पहिली पाणी एक्सप्रेस लातूरला रवाना झाली. १२ एप्रिलच्या मध्यरात्री ट्रेन लातूरमध्ये दाखल झाली. 
 
मिरज ते लातूर एकूण अंतर ३४२ कि.मी.चे होते. लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी खास राजस्थान कोटा येथून ट्रेन मागवण्यात आली होती. सुरुवातीला पाणी एक्सप्रेसला १० डब्बे जोडलेले होते. प्रत्येक डब्ब्यामध्ये ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता होती. त्यामुळे पहिल्या काही फे-यांमध्ये प्रत्येकवेळी पाच लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवण्यात आले. 
 
लातूर शहराची लोकसंख्या चार लाखापेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातील ९४३ गावांमध्ये १८ लाख लोकसंख्या आहे. अपु-या पावसामुळे लातूरमध्ये जलाशय, धरणे, नद्या आणि विहीरी आटल्या आहेत. 
 
कसे पाणी पोहोचवले जायचे
पाणी एक्सप्रेस जिथे थांबायची तिथून पाच ते सात कि.मी.च्या अंतरावरील एका मोठी विहीर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली होती. ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली होती. विहीरीमध्ये जमा होणारे पाणी तहानलेल्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर प्रशासनाने ७० टॅंकरची व्यवस्था केली होती. या सर्व टॅंकरची मिळून एकूण २२ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता होती.