शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
3
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
4
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
5
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
6
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
7
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
8
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
9
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
10
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
11
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
12
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
13
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
14
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
16
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
17
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
20
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

मागील वर्षी देशात ७५,००० युवकांचा रस्ता अपघातात मृत्यू

By admin | Updated: September 3, 2015 22:17 IST

मागील वर्षभरात भारतातील घातक रस्त्यांनी १५ ते ३४ वर्षे वयोगटातील ७५,००० युवकांचा बळी घेतला आहे. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८२ टक्के पुरुष असल्याचे भूपृष्ठ

नवी दिल्ली : मागील वर्षभरात भारतातील घातक रस्त्यांनी १५ ते ३४ वर्षे वयोगटातील ७५,००० युवकांचा बळी घेतला आहे. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८२ टक्के पुरुष असल्याचे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या २०१४ च्या रस्ता अपघात अहवालात म्हटले आहे.२०१४ या वर्षात घडलेल्या रस्ता अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये ५३ टक्के हे १५ ते ३४ वर्षे वयोगटातील आहेत, तर ३५ ते ६४ वर्षे वयोगटातील अपघात बळींचा वाटा ३५.७ टक्के आहे, असे या अहवालात म्हटले आहे. जागतिक रस्ता अपघातात जखमी होणे हे १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले होते. या वयोगटातील ३.४ लाख युवक दरवर्षी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात.यावरून युवक आणि तरुणांना रस्ता सुरक्षेच्या मुद्यावर अधिक जागृत करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे दिसते. रस्त्यावर सुरक्षितपणे कसे चालावे हे समजावून सांगण्यात कुटुंबीय मोठी भूमिका बजावू शकतात. हे मोठे नुकसान आहे, असे मत रस्ता सुरक्षातज्ज्ञ रोहित बालुजा यांनी व्यक्त केले आहे. रस्ता अपघातांत जखमी झालेले बहुतांश लोकांना उर्वरित जीवन अपंग बनूनच घालवावे लागते आणि त्यांचा भार कुटुंबियांवर पडतो, असे दिसून आले आहे.अपघातात जखमी झाल्यानंतर अपंगत्व आलेल्यांचे कुटुंब गरिबीत ढकलले जाते, असे आशियन विकास बँकेच्या अभ्यासात आढळले असल्याची माहिती जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय रस्ता महासंघाचे प्रमुख के.के. कपिला यांनी दिली.