शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

मागील वर्षी देशात ७५,००० युवकांचा रस्ता अपघातात मृत्यू

By admin | Updated: September 3, 2015 22:17 IST

मागील वर्षभरात भारतातील घातक रस्त्यांनी १५ ते ३४ वर्षे वयोगटातील ७५,००० युवकांचा बळी घेतला आहे. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८२ टक्के पुरुष असल्याचे भूपृष्ठ

नवी दिल्ली : मागील वर्षभरात भारतातील घातक रस्त्यांनी १५ ते ३४ वर्षे वयोगटातील ७५,००० युवकांचा बळी घेतला आहे. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८२ टक्के पुरुष असल्याचे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या २०१४ च्या रस्ता अपघात अहवालात म्हटले आहे.२०१४ या वर्षात घडलेल्या रस्ता अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये ५३ टक्के हे १५ ते ३४ वर्षे वयोगटातील आहेत, तर ३५ ते ६४ वर्षे वयोगटातील अपघात बळींचा वाटा ३५.७ टक्के आहे, असे या अहवालात म्हटले आहे. जागतिक रस्ता अपघातात जखमी होणे हे १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले होते. या वयोगटातील ३.४ लाख युवक दरवर्षी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात.यावरून युवक आणि तरुणांना रस्ता सुरक्षेच्या मुद्यावर अधिक जागृत करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे दिसते. रस्त्यावर सुरक्षितपणे कसे चालावे हे समजावून सांगण्यात कुटुंबीय मोठी भूमिका बजावू शकतात. हे मोठे नुकसान आहे, असे मत रस्ता सुरक्षातज्ज्ञ रोहित बालुजा यांनी व्यक्त केले आहे. रस्ता अपघातांत जखमी झालेले बहुतांश लोकांना उर्वरित जीवन अपंग बनूनच घालवावे लागते आणि त्यांचा भार कुटुंबियांवर पडतो, असे दिसून आले आहे.अपघातात जखमी झाल्यानंतर अपंगत्व आलेल्यांचे कुटुंब गरिबीत ढकलले जाते, असे आशियन विकास बँकेच्या अभ्यासात आढळले असल्याची माहिती जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय रस्ता महासंघाचे प्रमुख के.के. कपिला यांनी दिली.