शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

By admin | Updated: March 6, 2017 10:43 IST

अटारी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर रविवारी तब्बल 360 फूट उंचींचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज असल्याचे मानले जात आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 - अटारी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर रविवारी तब्बल 360 फूट उंचींचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज असल्याचे मानले जात आहे. हा तिरंगा 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद एवढा मोठ्या आकाराचा आहे. या ध्वज बनवण्यासाठी जवळपास 3.50 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. अमृतसर सुधार प्रन्यास प्राधिकरणाचा हा प्रकल्प आहे.  देशातील सर्वात उंच तिरंग्याचे पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी ध्वजारोहण केले. यापूर्वी झारखंडमधील रांची येथी 293 फूट उंच तिरंगा फडकवण्यात आला होता. 

हेरगिरीसाठी ध्वज लावल्याचा पाकिस्तानचा आरोप
दरम्यान, या आंतरराष्ट्रीय सीमेवर तिरंगा फडकवण्यावर पाकिस्तानने आक्षेप नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफकडे असंतोष व्यक्त करत सीमेपासून दूर ध्वज उभारण्याची मागणी केली आहे. या ध्वज उभारणीमुळे आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन होत असल्याचा कांगवाही पाकिस्तानने केला आहे. 'भारत या उंच तिरंग्याचा हेरगिरीसाठी वापर करू शकतो', असा संशयदेखील पाकिस्तानातील अधिका-यांनी व्यक्त केला आहे. 
 
कोणतेही उल्लंघन झालेले नाही : भारत 
दरम्यान, पाकिस्तानच्या या संशयावर भारताने आपले स्पष्टीकरण देत सांगितले की, सीमेपासून 200 मीटर अंतरावर हा ध्वज उभारण्यात आला आहे यामुळे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही. 
तर 'आमच्या धरतीवर आमचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यापासून आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही', असे खडेबोल मंत्री अनिल जोशी यांनीही पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.