शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

अटारी बॉर्डरवर सर्वांत उंच राष्ट्रध्वज, पाकिस्तानचा हेरगिरीचा कांगावा

By admin | Updated: March 6, 2017 10:43 IST

अटारी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर रविवारी तब्बल 360 फूट उंचींचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज असल्याचे मानले जात आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 - अटारी आंतरराष्ट्रीय बॉर्डरवर रविवारी तब्बल 360 फूट उंचींचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. हा ध्वज देशातील सर्वांत उंच ध्वज असल्याचे मानले जात आहे. हा तिरंगा 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद एवढा मोठ्या आकाराचा आहे. या ध्वज बनवण्यासाठी जवळपास 3.50 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. अमृतसर सुधार प्रन्यास प्राधिकरणाचा हा प्रकल्प आहे.  देशातील सर्वात उंच तिरंग्याचे पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी ध्वजारोहण केले. यापूर्वी झारखंडमधील रांची येथी 293 फूट उंच तिरंगा फडकवण्यात आला होता. 

हेरगिरीसाठी ध्वज लावल्याचा पाकिस्तानचा आरोप
दरम्यान, या आंतरराष्ट्रीय सीमेवर तिरंगा फडकवण्यावर पाकिस्तानने आक्षेप नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफकडे असंतोष व्यक्त करत सीमेपासून दूर ध्वज उभारण्याची मागणी केली आहे. या ध्वज उभारणीमुळे आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन होत असल्याचा कांगवाही पाकिस्तानने केला आहे. 'भारत या उंच तिरंग्याचा हेरगिरीसाठी वापर करू शकतो', असा संशयदेखील पाकिस्तानातील अधिका-यांनी व्यक्त केला आहे. 
 
कोणतेही उल्लंघन झालेले नाही : भारत 
दरम्यान, पाकिस्तानच्या या संशयावर भारताने आपले स्पष्टीकरण देत सांगितले की, सीमेपासून 200 मीटर अंतरावर हा ध्वज उभारण्यात आला आहे यामुळे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही. 
तर 'आमच्या धरतीवर आमचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यापासून आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही', असे खडेबोल मंत्री अनिल जोशी यांनीही पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.