शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन पारित करणारच

By admin | Updated: May 27, 2015 23:59 IST

भूसंपादन विधेयकात शेतकरी, गरीब, गाव आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या तर त्या मंजूर करण्यात येतील,

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकात शेतकरी, गरीब, गाव आणि राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही दुरुस्त्या सुचविण्यात आल्या तर त्या मंजूर करण्यात येतील, असे स्पष्ट करून भूसंपादन विधेयकासोबतच जीएसटी विधेयक संसदेत पारित करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.‘गाव, गरीब आणि शेतकरी यांना अनुकूल असलेल्या सूचना आल्या आणि त्या राष्ट्राच्या हिताच्या असल्या तर आम्ही लगेच त्या स्वीकृत करू,’ असे मोदी यांनी सांगितले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. भूसंपादन विधेयकावरील कोंडी कायम असल्यामुळे सरकार विरोधकांची मतेही मान्य करणार काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. जीएसटी आणि भूसंपादन ही दोन्ही विधेयके संसदेच्या समितीकडे पाठविण्यात आली आहेत आणि ही विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पारित होतील, अशी सरकारला आशा आहे.राज्यसभेत जीएसटी आणि भूसंपादन यांसारख्या महत्त्वाच्या विधेयकावरून कोंडी निर्माण झाल्यामुळे आर्थिक सुधारणांचा वेग मंदावला आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणाले, ही दोन्ही विधेयके देशाच्या हिताची आहेत. राजकारण बाजूला सारून सर्वच राजकीय पक्षांनी या विधेयकांची प्रशंसा करायला पाहिजे. राज्यांनी जीएसटी रचनेला सहमती दर्शविलेली आहे. जीएसटी विधेयक लोकसभेत पारितही झालेले आहे. आता ही दोन्ही विधेयके पारित होणे हा वेळेचा भाग आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)संपुआ सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ह्या पंतप्रधान कार्यालयावर ‘वास्तविक’ शक्तीचा वापर करीत असणाऱ्या ‘घटनाबाह्य शक्ती’च्या रूपात कार्यरत होत्या; परंतु आता मात्र घटनात्मक मार्गानेच सरकार चालविले जात आहे, अशी टीका मोदी यांनी बुधवारी केली.रालोआ सरकार संसदेत उघड अहंकार प्रदर्शित करीत आहे आणि हे सरकार केवळ एका व्यक्तीचे सरकार आहे, हा सोनियांचा आरोप फेटाळून लावताना मोदी म्हणाले, ‘याआधी खऱ्या अर्थाने घटनाबाह्य शक्ती सत्ता संचालन करीत होती व सोनिया गांधी ह्या कदाचित त्याचाच उल्लेख करीत असाव्यात. आता मात्र सत्तेचे संचालन घटनात्मक मार्गाने केले जात आहे. आम्ही घटनात्मक मार्गाने काम करीत आहोत मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांवरही शरसंधान केले. यावेळी त्यांनी पीएमओमध्ये शक्ती केंद्रित होणे, अल्पसंख्याक, बिगर सरकारी संघटना, भूसंपादन आणि जीएसटी विधेयक, आर्थिक सुधारणा व अन्य अनेक मुद्यांवरील प्रश्नांची उत्तरे दिली.पंतप्रधान कार्यालयात सर्व शक्ती केंद्रिभूत झाल्याच्या आरोपाबद्दल विचारले असता मोदी म्हणाले, ‘हा प्रश्न तेव्हा विचारला असता तर बरे झाले असते, जेव्हा एक घटनाबाह्य शक्ती घटनात्मक शक्तीवर बसलेली होती आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व शक्तींचा वापर करीत होती. पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालय हे पूर्णपणे घटनात्मक व्यवस्थेचा भाग आहेत.’राहुल गांधी यांच्या ‘सुटाबुटातील सरकार’ या आरोपावर मोदी म्हणाले, वर्ष लोटले तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव अद्याप पचविता आलेला नाही. जनतेने काँग्रेसला तिच्या चुका व पापांबद्दल दंड दिला आहे. यातून काँग्रेस काही शिकेल, असे आम्हाला वाटले होते; पण तसे काही होताना दिसत नाही.