शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

भूसंपादन विधेयकावर माघार नाहीच

By admin | Updated: March 20, 2015 01:31 IST

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भूसंपादन विधेयकावर आक्रमक धोरण अवलंबत वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा समेटाचा आणि खुल्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे.

नबीन सिन्हा - नवी दिल्लींकाँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भूसंपादन विधेयकावर आक्रमक धोरण अवलंबत वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा समेटाचा आणि खुल्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे.गडकरींनी गुरुवारी खुल्या चर्चेचे आव्हान देतानाच समेट घडवून आणण्यासाठी तयारी दर्शविली होती. सोनिया गांधी यांनी अलीकडेच १४ पक्षांची एकजूट घडवत राष्ट्रपती भवनावर ‘निषेध मार्च’ नेला होता. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुढील आठवड्यात हरियाणा आणि राजस्थानमध्ये रॅली घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. भूसंपादन विधेयकातील सुधारणांमुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत सावध करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. भूसंपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि अन्य पक्षांशी वाटाघाटी करण्याची तयारी गडकरी यांनी एका पत्रात दर्शविली होती.त्याला उत्तर देताना काँग्रेसने सरकारला मूळ मुद्यापासून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न थांबविण्याचा इशारा दिला. योग्य मोबदल्याचा अधिकार विधेयक २०१३ मध्ये सुधारणा करीत वटहुकूम आणण्यामागे मूळ उद्देशाला मूठमाती देण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.संपुआने आणलेल्या विधेयकाला भाजपने समर्थन दिले होते, मग मोदी सरकारने आता वटहुकूम आणण्याचे कारण काय? यावर मोदी व गडकरी या दोघांनीही स्पष्टीकरण द्यावे. देशभर या विधेयकाविरुद्ध आक्रोश सुरू असताना लोकसभेने ते बहुमताच्या बळावर पारित का केले? गडकरींना सरकारचे प्रवक्ते व मध्यस्थ नेमण्यात आले असताना ग्रामीण विकास मंत्री मौन का बाळगून आहेत? असा सवालही काँग्रेसने केला आहे.