शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

भूसंपादन विधेयकावर चौथ्यांदा वटहुकूम ?

By admin | Updated: August 26, 2015 03:45 IST

भूसंपादन विधेयकावर चौथ्यांदा वटहुकूम आणण्याचा विक्रम मोदी सरकारच्या नावावर जमा होण्याचे संकेत मिळाले आहेत. ३१ आॅगस्टपूर्वी संसदेत विधेयक संमत होण्याची

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकावर चौथ्यांदा वटहुकूम आणण्याचा विक्रम मोदी सरकारच्या नावावर जमा होण्याचे संकेत मिळाले आहेत. ३१ आॅगस्टपूर्वी संसदेत विधेयक संमत होण्याची शक्यता नसल्यामुळे सातत्य राखण्यासाठी सरकारकडे वटहुकमाचाच पर्याय उरेल.जुन्या कायद्यात नोकऱ्या देण्याची तरतूद नव्हती. सर्व बाबी विचारात घेऊन हा कायदा आणण्यात आला आहे, असे संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी पत्रकारांना सांगितले. २०१३ मध्ये भूसंपादन कायदा मंजूर झाला तेव्हा भूसंपादनासंबंधी १३ कायदे त्याच्या कक्षेत आणण्यात आले नव्हते. वर्षभरात अन्य कायदे त्यात समाविष्ट करण्याची अट होती. मोदी सरकारने नव्या कायद्यासंबंधी वटहुकूम जारी करताना १३ कायदे त्यात समाविष्ट केले. ३१ आॅगस्ट रोजी वटहुकूम मोडीत निघाल्यास भूसंपादन करताना नवा कायदा लागू करता येणार नाही. त्यात हा कायदा कायम राखण्यासाठीच यापूर्वी तीनदा वटहुकूम जारी करण्यात आला.काही तरतुदींवर मतभेद कायमभाजपचे खासदार एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) शेतकऱ्यांची परवानगी अनिवार्य करणे, सामाजिक परिणामांचा आढावा घेण्यासारख्या महत्त्वपूर्ण तरतुदींवर सहमती घडवून आणली असली तरी काही मुद्यांवर मतभेद कायम आहेत. या समितीने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारला या आठवड्यात वटहुकमाबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)