शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

भूसंपादन विधेयकावर अखेर सरकारचे नमते

By admin | Updated: August 5, 2015 02:08 IST

वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर तीनवेळा वटहुकूम जारी करीत हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविणाऱ्या सरकारने अखेर नमते घेणार असल्याचे संकेत मंगळवारी दिले.

 

अनेक आक्षेप घेतले गेल्यानंतरही हे विधेयक रेटण्याचा प्रयत्न करणा:या सरकारला अखेर नमते घ्यावे लागण्याचे स्पष्ट संकेत मंगळवारी मिळाले. या विधेयकाची चिकित्सा करीत असलेल्या संसदीय समितीच्या शिफारशी स्वीकारण्याची सरकारने तयारी दाखविल्यानंतरही हे नरमाईचे धोरण नाही, असा पवित्र ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्रसिंग यांनी घेतला आहे.

काँग्रेस आणि डाव्यांखेरीज वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर तीनवेळा वटहुकूम जारी करीत हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविणाऱ्या सरकारने अखेर नमते घेणार असल्याचे संकेत मंगळवारी दिले. या विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचीही सरकारने तयारी दर्शविली. मात्र, त्याचबरोबर याचा अर्थ सरकारने नरमाईचे धोरण अवलंबले असा होत नाही, आम्ही नेहमीच सहमतीवर भर दिला आहे, असा खुलासा ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्रसिंग यांनी केला आहे.कोणतीही संस्था, राजकीय नेते, पक्ष किंवा शेतकऱ्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांवर आमचा कोणताही आक्षेप नसेल असे आम्ही प्रारंभापासून सांगत आलो आहे. सहमतीच्या मुद्यांवर विचार व्हायलाच हवा. शेवटी संयुक्त संसदीय समिती ही मिनी संसदच असते. काही लोकांचा आक्षेप किंवा नाराजी असेल तर आम्ही त्या सूचनांचा अभ्यास करू, असे त्यांनी येथे एका पत्रपरिषदेत स्पष्ट केले. संयुक्त समितीच्या अहवालावरच आमची भूमिका अवलंबून राहणार असून ७ आॅगस्टनंतर ते स्पष्ट होईल. समितीच्या अहवालावर सहमती आहे किंवा नाराजी आहे ते समितीच्या अहवालातच कळेल. स्वपक्षीयांनी सुचविल्या सुधारणा संपुआने आणलेल्या कायद्यातील जमिनी ताब्यात घेताना शेतकऱ्यांची परवानगी अनिवार्य करणारे परिशिष्ट कायम ठेवण्याची महत्त्वपूर्ण सुधारणा एस. एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील संयुक्त संसदीय समितीने स्वीकारली आहे. सरकारला नमते घेत भूमिकेत बदल करावा लागण्याचे कारण भाजपच्याच ११ खासदारांनी सुचविलेल्या दुरुस्त्या हेच आहे. संपुआने आणलेल्या कायद्यात शेतकऱ्यांची परवानगी आणि सामाजिक परिणामांचा आढावा घेणे बंधनकारक केले होते. मोदी सरकारने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या कायद्यात बदल करताना या दोन्ही महत्त्वपूर्ण तरतुदी वगळत वटहुकूम जारी केला होता. ही लोकशाहीची थट्टाच- येचुरी मोदी सरकारने भूसंपादन विधेयकातील सुधारणा मागे घेण्याचा निर्णय घेणे ही संसदीय लोकशाहीची थट्टाच आहे. सरकारने तीन वटहुकूम आणण्याची गरज काय? असा सवाल माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)