शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लालूंचे मोदींना चॅलेंज, तर बरखास्त करून दाखवा लोकसभा

By admin | Updated: May 15, 2017 13:37 IST

भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान लालूप्रसाद यादव यांनी मोदींना दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा बरखास्त करून इतरा राज्यांसोबत निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान लालूप्रसाद यादव यांनी मोदींना दिलं आहे. मोदींनी लोकप्रियतेची चाचपणी करण्यासाठी विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबत लोकसभेचीही निवडणूक घ्यावी, असे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत.राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रितरीत्या घ्याव्यात, नीती आयोगाच्या सूचनेचेही लालूप्रसाद यादव यांनी समर्थन केलं आहे. लालूप्रसाद यादव म्हणाले, सरकारला तीन वर्षे झाली आहेत. आता लवकरच सहा राज्यांचा विधानसभा निवडणुका होणार आहेत. या वर्षभरात गुजरात, नागालँड, कर्नाटका, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मोदी सरकारमध्ये हिंमत असल्यास त्यांनी लोकसभा बरखास्त करून ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांसोबतच लोकसभेची निवडणूक घ्यावी, त्यावेळी तुम्हाला तुमच्या लोकप्रियतेची जाणीव होईल, अशी टीकाही लालूंनी मोदींवर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केलं आहे.लालूप्रसाद यादव म्हणाले, नीती आयोगाने विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा पर्याय सुचवला आहे. नीती आयोगाला संघराज्यीय पद्धत आणि प्रादेशिक पक्षांना संपवायचे असल्यानंच असे पर्याय सुचवले जात आहेत. नीती आयोगाच्या माध्यमातून भाजपाचा घटनेत बदल करण्याचा डाव असल्याचाही आरोप लालूंनी केला आहे. देश मोदींच्या हाती सुरक्षित नाही. मोदींना देशाचे तुकडे करायचे आहेत. यांनी देशांतर्गत अस्थिरता निर्माण केली असून, भाजपाचे सरकार हे घाबरट आहे. ते फक्त सत्तेसाठी लाचार आहेत, असंही लालू म्हणाले आहेत. मोदींच्या सत्ताकाळातच आमच्या अनेक जवानांचे खुलेआम शिर कापले गेले. याला जबाबदार कोण, असा प्रश्नही लालूप्रसाद यादवांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस (यूपीए) सरकार केंद्रात होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला नाही. पण आता तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही सत्तेवर असताना काश्मीरमधील मतदानाचा टक्काही चांगला होता. आज तो घसरला असून अवघे सात टक्के मतदान नोंदवले गेले आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीने हुतात्म्याचा दर्जा दिला होता. आज त्याच पक्षाच्या सोबतीनं भाजपाने सरकार स्थापन केल्याची टीकाही मोदींनी केली आहे.