शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

लालू-नितीश दिलजमाई

By admin | Updated: June 8, 2015 01:43 IST

बिहारमध्ये सत्तारूढ संजद (जेडी- यू) आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदने एकत्रितपणे लढण्याचा आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तारूढ संजद (जेडी- यू) आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदने एकत्रितपणे लढण्याचा आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात दोन तास चाललेल्या चर्चेनंतर समाजवादी पार्टीचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी त्याबाबत माहिती दिली. जागावाटपाबाबत चर्चेसाठी स्थापन समितीतील सहा सदस्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश राहणार असून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल कोणताही वाद नसून नंतर या बाबींकडे बघितले जाईल, असे ते म्हणाले.बिहार हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्य असून भाजपने सत्ता हिसकावून घेण्यासाठी चालविलेली तयारी पाहता मुलायमसिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी या दोन नेत्यांनी चर्चा केली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार असेल तर स्वत: १०० जागा सोडून राजद, काँग्रेस, डावे व इतरांसाठी बाकीच्या १४३ जागा सोडण्याची नितिश कुमार यांची तयारी आहे. पण यास लालू प्रसादांचा विरोध आहे. कारण नितिश कुमार यांचे नाव आधीच जाहीर केले तर दलित व महादलित समाजात वजन असलेल्या जितनराम मांझी यांना सोबत घेण्यात अडचणी येतील, असे लालूंना वाटते. दुसरीकडे मांझी यांना जवळ करण्याचा काँग्रेसचाही प्रयत्न सुरु आहे.(वृत्तसंस्था) नितीशकुमार राहुल गांधींना भेटले> नितीशकुमार यांनी नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे भाजपविरुद्ध व्यापक धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याच्या चर्चेला जोर चढला आहे. नितीशकुमार आणि राहुल यांनी तासभर चर्चा केली असली तरी त्याचा तपशील बाहेर आलेला नाही.> बिहारमध्ये धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याला अनुकूलता दर्शवतानाच राजद आणि संजदची युती होऊ न शकल्यास नितीशकुमार यांच्यासोबत जाण्याचा मार्ग अवलंबणार असल्याचे काँग्रेसने याआधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नितीशकुमार यांना झुकते माप दिल्याचे संकेत त्यातून दिले गेले आहेत. >मुख्यमंत्रिपदाला बगल... नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर लालूप्रसाद आणि नितीशकुमार प्रथमच एकत्र आले. हा मुद्दा नंतर सोडविला जावा, यावर लालूप्रसाद ठाम राहिले आहेत. त्यामुळे तूर्तास मुख्यमंत्रिपदाच्या मुद्याला बगल दिली गेल्याचे स्पष्ट झाले.