शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

लालू-नितीश दिलजमाई

By admin | Updated: June 8, 2015 01:43 IST

बिहारमध्ये सत्तारूढ संजद (जेडी- यू) आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदने एकत्रितपणे लढण्याचा आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तारूढ संजद (जेडी- यू) आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदने एकत्रितपणे लढण्याचा आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात दोन तास चाललेल्या चर्चेनंतर समाजवादी पार्टीचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी त्याबाबत माहिती दिली. जागावाटपाबाबत चर्चेसाठी स्थापन समितीतील सहा सदस्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश राहणार असून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल कोणताही वाद नसून नंतर या बाबींकडे बघितले जाईल, असे ते म्हणाले.बिहार हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्य असून भाजपने सत्ता हिसकावून घेण्यासाठी चालविलेली तयारी पाहता मुलायमसिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी या दोन नेत्यांनी चर्चा केली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार असेल तर स्वत: १०० जागा सोडून राजद, काँग्रेस, डावे व इतरांसाठी बाकीच्या १४३ जागा सोडण्याची नितिश कुमार यांची तयारी आहे. पण यास लालू प्रसादांचा विरोध आहे. कारण नितिश कुमार यांचे नाव आधीच जाहीर केले तर दलित व महादलित समाजात वजन असलेल्या जितनराम मांझी यांना सोबत घेण्यात अडचणी येतील, असे लालूंना वाटते. दुसरीकडे मांझी यांना जवळ करण्याचा काँग्रेसचाही प्रयत्न सुरु आहे.(वृत्तसंस्था) नितीशकुमार राहुल गांधींना भेटले> नितीशकुमार यांनी नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे भाजपविरुद्ध व्यापक धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याच्या चर्चेला जोर चढला आहे. नितीशकुमार आणि राहुल यांनी तासभर चर्चा केली असली तरी त्याचा तपशील बाहेर आलेला नाही.> बिहारमध्ये धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याला अनुकूलता दर्शवतानाच राजद आणि संजदची युती होऊ न शकल्यास नितीशकुमार यांच्यासोबत जाण्याचा मार्ग अवलंबणार असल्याचे काँग्रेसने याआधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नितीशकुमार यांना झुकते माप दिल्याचे संकेत त्यातून दिले गेले आहेत. >मुख्यमंत्रिपदाला बगल... नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर लालूप्रसाद आणि नितीशकुमार प्रथमच एकत्र आले. हा मुद्दा नंतर सोडविला जावा, यावर लालूप्रसाद ठाम राहिले आहेत. त्यामुळे तूर्तास मुख्यमंत्रिपदाच्या मुद्याला बगल दिली गेल्याचे स्पष्ट झाले.