शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

ललित मोदी प्रकरण; सरकार भूमिकेवर ठाम

By admin | Updated: July 3, 2015 02:48 IST

ललितगेट प्रकरणात काही केंद्रीय मंत्र्यांच्या आचरणाबाबत दररोज नवे खुलासे होत असले तरी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यामुळे अजिबात विचलित न होता आपली भूमिका आणखी

हरीश गुप्ता , नवी दिल्लीललितगेट प्रकरणात काही केंद्रीय मंत्र्यांच्या आचरणाबाबत दररोज नवे खुलासे होत असले तरी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यामुळे अजिबात विचलित न होता आपली भूमिका आणखी कठोर केली आहे. आपल्या कोणत्याही मंत्र्याविरुद्ध कारवाई केली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने दिले आहेत.‘कोणताही राजकीय पक्ष देशाच्या विकासाच्या मुद्यावर नकारात्मक दृष्टिकोन बाळगणार नाही,’ असे सांगून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकारने नमते घेण्याऐवजी आणखी कठोर बनण्याचे ठरविले असल्याचे संकेत गुरुवारी दिले. काही राजकीय पक्षांकडून संसदेचे पावसाळी अधिवेशन ठप्प पाडण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न जेटली यांना पत्रकारांनी विचारला. ‘केवळ मीडियात आलेल्या बातम्यांच्या आधारावर राजीनामा मागितला जाऊ शकत नाही. काही लोक वाहिन्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असू शकतात. मात्र, सरकारच्या दृष्टीने ते फारसे महत्त्वाचे नाहीत,’ असे म्हणाले.जेटली यांनी ललित मोदी वादावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन ठप्प पाडण्याचा काँग्रेसने दिलेला इशारा फेटाळून लावला. भूसंपादन दुरुस्ती विधेयक आणि अखिल भारतीय स्तरावर वस्तू व सेवा कर लागू करण्याच्या संदर्भातील विधेयक देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कोणताही राजकीय पक्ष वृद्धी आणि विकासाच्या विरोधात भूमिका घेणार नाही, अशी आशा असल्याचे जेटली म्हणाले.