शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह तीन बंदरे तोट्यात

By admin | Updated: May 13, 2016 04:09 IST

देशातील १२ बंदरांपैकी ३ बंदरे तोट्यात असून, त्यात मुंबई बंदराचा समावेश आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही पावले उचलण्यात येत असून, महसुलात वाढ केली जात असल्याचे केंद्रीय

नवी दिल्ली : देशातील १२ बंदरांपैकी ३ बंदरे तोट्यात असून, त्यात मुंबई बंदराचा समावेश आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही पावले उचलण्यात येत असून, महसुलात वाढ केली जात असल्याचे केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी राज्यसभेत सांगितले. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी बंदरांच्या स्थितीबाबत प्रश्न विचारला होता.मुंबई, कोचीन आणि कोलकाता बंदरांना २०१५-१६ मध्ये नुकसान सोसावे लागले. त्यानंतर सरकारने या बंदरांच्या आर्थिक स्थितीवर कायम नजर ठेवण्याचे काम सुरू केले आहे. या बंदरांच्या मालमत्तेचा योग्य वापर करण्यासह जमीन, महसुलात वाढ, स्थापना आणि संचालन खर्च कमी करतानाच क्षमता सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. खर्चात कपात करण्यावरही भर दिला जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)सागरमाला कार्यक्रम...जुन्या बंदरांचे आधुनिकीकरण आणि नव्यांचा विकास, बंदरांची आपसात जोडणी, बंदरांवर आधारित औद्योगिक विकास तसेच किनारपट्टीवरील समुदायाचे जीवनमान सुधारण्यावर भर देणे, हे सागरमाला कार्यक्रमाचे उद्दिष्ट असेल. किनारपट्टी आणि सागरी क्षेत्राच्या योग्य विकासासाठी राष्ट्रीय योजना (एनपीपी) तयार करण्यात आली असून, ती सागरमाला कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्यात १५० पेक्षा जास्त प्रकल्पांची ओळख पटविण्यात आली आहे. एनपीपीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या निवडक प्रकल्पांचा समावेश पीपीपी मॉडेलमध्ये करण्यात आला असल्याचे राधाकृष्णन यांनी नमूद केले.महाराष्ट्रात ‘साई’साठी १६ कोटींपेक्षा जास्त मदत...भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे(साई)महाराष्ट्रात एक क्षेत्रीय केंद्र, दोन प्रशिक्षण केंद्र, १५ आखाडे, सात विस्तार केंद्र तसेच दोन राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा स्पर्धा योजना चालविल्या जात आहेत. त्यासाठी २०१५-१६ या वर्षात १६ कोटी ६४ लाख १० हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी खा. दर्डा यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले. कांदिवली येथील केंद्रातील क्रीडा सुविधांच्या विकासाबाबत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.