शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आसाममध्ये विकासाचा अभाव

By admin | Updated: January 20, 2016 03:22 IST

काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीमुळे आसामची पीछेहाट झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत असलेल्या या राज्यामध्ये विकासाचा अभाव दिसून येतो

कोक्राझार : काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीमुळे आसामची पीछेहाट झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत असलेल्या या राज्यामध्ये विकासाचा अभाव दिसून येतो, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल करीत मंगळवारी येथील रॅलीत भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला.आसाममधील दोन समुदायाला आदिवासी जमातींचा दर्जा देण्यासह विविध घोषणाही त्यांनी केल्या. भाजप आणि नव्याने स्थापन झालेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) बोडोफानगर येथे संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या जाहीरसभेत त्यांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला केला. बोडोलँड प्रांतीय परिषदेच्या (बीटीसी) अंतर्गत येणाऱ्या भूभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अन्य चार राज्यांसोबत आसाममधील १२६ सदस्यीय विधानसभेची निवडणूक एप्रिल- मे मध्ये होण्याची शक्यता आहे. या भागातील जनतेचा काँग्रेसने विश्वासघात केला आहे. या राज्याने देशाला दहा वर्षे पंतप्रधान दिला आहे. या राज्यात काँग्रेसचे १५ वर्षे आणि केंद्रातही सरकार असताना एवढे प्रश्न का निर्माण झाले. या पक्षाने १५ वर्षे काहीही केले नाही, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)