शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

श्रेष्ठींना न भेटताच राजे परतल्या

By admin | Updated: June 28, 2015 03:39 IST

ललित मोदी वादात गुरफटलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या.

नवी दिल्ली : ललित मोदी वादात गुरफटलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आल्या होत्या. परंतु बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी कुणालाही न भेटताच त्या जयपूरला परतल्याने चर्चेला उधाण आले आहे. राजे यांनी स्वत: पक्ष नेत्यांना भेटण्याचे टाळले, की त्यांना भेट नाकारण्यात आली,याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही. विरोधी पक्षांकडून राजे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत असून पक्षाकडून मात्र त्यांची पाठराखण केली जात आहे. राजे सकाळी ९.३० वाजता दिल्लीत पोहोचल्या आणि जवळपास चार तासांनी जयपूरला परतही गेल्या. दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान तसेच पक्षाध्यक्षांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता की नाही याबाबत पक्ष सूत्रांनी मौन धारण केले आहे. गुरुवारी रात्री मोदी आणि शहा यांच्या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींनी या वादावर राजे यांनी दिलेले स्पष्टीकरण मान्य केले असल्याचे संकेत मिळाले होते. राजे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आपला पूर्वनियोजित लंडन दौरा रद्द केला होता. त्या २७ जून ते २ जुलै दरम्यान लंडन दौऱ्यावर जाणार होत्या.जयपूर येथून मिळालेल्या वृत्तानुसार नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर राजे विशेष विमानाने जयपूरला परतल्या असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क) - राजस्थान प्रदेश भाजपने वसुंधरा राजे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतरण अर्जाच्या समर्थनात वसुंधरा राजे यांनी स्वाक्षरी केलेले दस्तावेज कधी न्यायालयात सादर झालेच नाहीत. कारण नंतर त्यांनी यातून माघार घेतली होती, असा खुलासा प्रदेश शाखेने केला आहे. राजे यांच्या मुलाच्या हॉटेलमध्ये मोदी यांनी केलेली गुंतवणूक कायदेशीर असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती, असाही संघटनेचा दावा आहे.