शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

सरकारी पॅलेसवर ‘राजे’शाही

By admin | Updated: June 30, 2015 02:01 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला

शीलेश शर्मा, नवी दिल्लीराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ‘ललितगेट’ वादामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच नव्या आरोपांमुळे राजे यांच्या अडचणीत भर पडली आहे.वसुंधरा राजे यांचे विभक्त झालेले पती हेमंतसिंग यांनी धोलपूर पॅलेस ही राजस्थान सरकारची मालमत्ता असल्याची कबुली न्यायालयात दिली होती. १९५४ ते २०१० या काळात महसूल विभागाच्या अनेक दस्तऐवजातही तसा उल्लेख आढळतो. राजे आणि ललित मोदी यांच्या नियंत हेरिटेज हॉटेल या कंपनीने धोलपूर पॅलेसचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर करताना शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर राज्य सरकारची कोणतीही भूमिका राहिली नाही. २००९ नंतर हे घडले. राजे यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात नियंत हेरिटेज हॉटेलमध्ये पुत्र दुष्यंतसिंग, सून निहारिका व ललित मोदी यांच्यासोबत शेअर्स खरेदी केल्याचा उल्लेख केला. राजेंकडे ३२८०, तर पुत्र व सुनेकडे प्रत्येकी ३२२५ शेअर्स तर मोदी यांच्या आनंद हेरिटेज हॉटेल प्रा. लिमिटेडमध्ये ८१५ शेअर्स असल्याची बाब राजे यांनी नमूद केली. यातून त्यांचे फरार मोदींशी असलेले व्यावसायिक संबंध उघड होतात, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)या कंपनीत गुंतवणुकीसाठी मॉरिशस मार्गाचा अवलंबण्यात आला. कर वाचविण्यासाठी मॉरिशसमध्ये गुंतवणूक दाखविण्यात आली असा आरोपही रमेश यांनी केला. ललित मोदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन पाळून असल्याबद्दल रमेश यांनी त्यांना ‘स्वामी मौनेंद्र बाबा’ असे संबोधत टर उडविली.भाजपने आरोप फेटाळलाधोलपूर पॅलेस खासदार दुष्यंतसिंग यांच्या मालकीचा नसल्याचा रमेश यांनी केलेला दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी व राजस्थानचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी फेटाळला आहे. हेमंतसिंग यांनी धोलपूरची मालकी दुष्यंत यांच्याकडे सोपविल्यासंबंधी न्यायालयीन दस्तऐवज दाखवत परनामी यांनी आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान योग्य वेळी बोलतील-सिंग-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक बाबीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते योग्य वेळ येताच बोलतील, असे सांगत केंद्रीय विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी मोदींच्या मौनाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.