शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी पॅलेसवर ‘राजे’शाही

By admin | Updated: June 30, 2015 02:01 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला

शीलेश शर्मा, नवी दिल्लीराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ‘ललितगेट’ वादामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच नव्या आरोपांमुळे राजे यांच्या अडचणीत भर पडली आहे.वसुंधरा राजे यांचे विभक्त झालेले पती हेमंतसिंग यांनी धोलपूर पॅलेस ही राजस्थान सरकारची मालमत्ता असल्याची कबुली न्यायालयात दिली होती. १९५४ ते २०१० या काळात महसूल विभागाच्या अनेक दस्तऐवजातही तसा उल्लेख आढळतो. राजे आणि ललित मोदी यांच्या नियंत हेरिटेज हॉटेल या कंपनीने धोलपूर पॅलेसचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर करताना शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर राज्य सरकारची कोणतीही भूमिका राहिली नाही. २००९ नंतर हे घडले. राजे यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात नियंत हेरिटेज हॉटेलमध्ये पुत्र दुष्यंतसिंग, सून निहारिका व ललित मोदी यांच्यासोबत शेअर्स खरेदी केल्याचा उल्लेख केला. राजेंकडे ३२८०, तर पुत्र व सुनेकडे प्रत्येकी ३२२५ शेअर्स तर मोदी यांच्या आनंद हेरिटेज हॉटेल प्रा. लिमिटेडमध्ये ८१५ शेअर्स असल्याची बाब राजे यांनी नमूद केली. यातून त्यांचे फरार मोदींशी असलेले व्यावसायिक संबंध उघड होतात, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)या कंपनीत गुंतवणुकीसाठी मॉरिशस मार्गाचा अवलंबण्यात आला. कर वाचविण्यासाठी मॉरिशसमध्ये गुंतवणूक दाखविण्यात आली असा आरोपही रमेश यांनी केला. ललित मोदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन पाळून असल्याबद्दल रमेश यांनी त्यांना ‘स्वामी मौनेंद्र बाबा’ असे संबोधत टर उडविली.भाजपने आरोप फेटाळलाधोलपूर पॅलेस खासदार दुष्यंतसिंग यांच्या मालकीचा नसल्याचा रमेश यांनी केलेला दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी व राजस्थानचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी फेटाळला आहे. हेमंतसिंग यांनी धोलपूरची मालकी दुष्यंत यांच्याकडे सोपविल्यासंबंधी न्यायालयीन दस्तऐवज दाखवत परनामी यांनी आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान योग्य वेळी बोलतील-सिंग-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक बाबीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. ते योग्य वेळ येताच बोलतील, असे सांगत केंद्रीय विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी मोदींच्या मौनाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले.