शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जमावाने ठार मारण्याच्या घटना घृणास्पद

By admin | Updated: July 1, 2017 01:07 IST

देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले. अशा घटना भविष्यात न घडण्यासाठी जिल्हा व राज्य पातळीवरील कायदा राबवणाऱ्या यंत्रणांनी परिणामकारक पावले उचलली पाहिजेत, असे नायडू म्हणाले. गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून झारखंडमध्ये जमावाने गुरुवारी एकाला ठार मारल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. त्याआधी झारखंडमध्येच एकाच्या घराबाहेर गाय मेलेली असल्याचे पाहून, त्या घरात राहणाऱ्याला जमावाने मारहाण केली होती आणि त्याचे घरही पेटविले होते.अशा घटनांचा निषेध प्रत्येकाकडून झाला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर दुसऱ्यांदा बोलले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांत अशा घटना घडत असून त्या घृणास्पद व क्रूर आहेत. या घटनांशी कोणताही धार्मिक मुद्दा जोडलेला नाही, असे नायडू यांनी म्हटले. ताजी घटना ही झारखंडमधील रामगढ येथील असून तेथे जमावाने अलिमुद्दिन असघर याला ठार मारले. अलिमुद्दिन हा त्याच्या वाहनातून गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला अडवले होते. गोरक्षकांनी गायीचे नाव घेऊन माणसांना ठार मारणे सहन केले जाणार नाही, असे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात केलेल्या भाषणात म्हणाले होते. त्यानंतर झारखंडमध्ये दुसरी घटना घडली.आतापर्यंत २४ घटना-देशात मे २0१४पासून गोरक्षणाच्या नावाखाली विविध राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या ३२ हल्ल्यांमध्ये २४ जण मरण पावले आहेत. अशा हल्ल्यांमध्ये ५0 जण जखमी झाले असून, दोन बलात्काराचे प्रकारही घडले आहेत.