शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जमावाने ठार मारण्याच्या घटना घृणास्पद

By admin | Updated: July 1, 2017 01:07 IST

देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले. अशा घटना भविष्यात न घडण्यासाठी जिल्हा व राज्य पातळीवरील कायदा राबवणाऱ्या यंत्रणांनी परिणामकारक पावले उचलली पाहिजेत, असे नायडू म्हणाले. गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून झारखंडमध्ये जमावाने गुरुवारी एकाला ठार मारल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. त्याआधी झारखंडमध्येच एकाच्या घराबाहेर गाय मेलेली असल्याचे पाहून, त्या घरात राहणाऱ्याला जमावाने मारहाण केली होती आणि त्याचे घरही पेटविले होते.अशा घटनांचा निषेध प्रत्येकाकडून झाला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर दुसऱ्यांदा बोलले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांत अशा घटना घडत असून त्या घृणास्पद व क्रूर आहेत. या घटनांशी कोणताही धार्मिक मुद्दा जोडलेला नाही, असे नायडू यांनी म्हटले. ताजी घटना ही झारखंडमधील रामगढ येथील असून तेथे जमावाने अलिमुद्दिन असघर याला ठार मारले. अलिमुद्दिन हा त्याच्या वाहनातून गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला अडवले होते. गोरक्षकांनी गायीचे नाव घेऊन माणसांना ठार मारणे सहन केले जाणार नाही, असे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात केलेल्या भाषणात म्हणाले होते. त्यानंतर झारखंडमध्ये दुसरी घटना घडली.आतापर्यंत २४ घटना-देशात मे २0१४पासून गोरक्षणाच्या नावाखाली विविध राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या ३२ हल्ल्यांमध्ये २४ जण मरण पावले आहेत. अशा हल्ल्यांमध्ये ५0 जण जखमी झाले असून, दोन बलात्काराचे प्रकारही घडले आहेत.