शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

जमावाने ठार मारण्याच्या घटना घृणास्पद

By admin | Updated: July 1, 2017 01:07 IST

देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात जमावाने ठार मारण्याच्या घटनांचे वर्णन केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘घृणास्पद’ या शब्दात केले आहे. मात्र या घटनांकडे धार्मिक अंगाने बघण्यात येऊ नये, असेही स्पष्ट केले. अशा घटना भविष्यात न घडण्यासाठी जिल्हा व राज्य पातळीवरील कायदा राबवणाऱ्या यंत्रणांनी परिणामकारक पावले उचलली पाहिजेत, असे नायडू म्हणाले. गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून झारखंडमध्ये जमावाने गुरुवारी एकाला ठार मारल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी ते येथे वार्ताहरांशी बोलत होते. त्याआधी झारखंडमध्येच एकाच्या घराबाहेर गाय मेलेली असल्याचे पाहून, त्या घरात राहणाऱ्याला जमावाने मारहाण केली होती आणि त्याचे घरही पेटविले होते.अशा घटनांचा निषेध प्रत्येकाकडून झाला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर दुसऱ्यांदा बोलले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांत अशा घटना घडत असून त्या घृणास्पद व क्रूर आहेत. या घटनांशी कोणताही धार्मिक मुद्दा जोडलेला नाही, असे नायडू यांनी म्हटले. ताजी घटना ही झारखंडमधील रामगढ येथील असून तेथे जमावाने अलिमुद्दिन असघर याला ठार मारले. अलिमुद्दिन हा त्याच्या वाहनातून गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला अडवले होते. गोरक्षकांनी गायीचे नाव घेऊन माणसांना ठार मारणे सहन केले जाणार नाही, असे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात केलेल्या भाषणात म्हणाले होते. त्यानंतर झारखंडमध्ये दुसरी घटना घडली.आतापर्यंत २४ घटना-देशात मे २0१४पासून गोरक्षणाच्या नावाखाली विविध राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या ३२ हल्ल्यांमध्ये २४ जण मरण पावले आहेत. अशा हल्ल्यांमध्ये ५0 जण जखमी झाले असून, दोन बलात्काराचे प्रकारही घडले आहेत.