शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

सहा पोलिसांची हत्या करणा-या दहशतवादी बशीर लष्करीचा खात्मा

By admin | Updated: July 1, 2017 15:20 IST

लष्कर कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - लष्कर कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु होती. या चकमकीदरम्यान दोघांना ठार करण्यात आलं. दोघांचा खात्मा झाल्यानंतर अखेर चकमक थांबली आहे. मात्र या चकमकीदरम्यान दोन सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. 
 
"दहशतवादी एका घरात लपून बसले होते, यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु असताना गोळ्या लागल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची", माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितलं आहे. दहशतवाद्यंच्या ताब्यात असलेल्या घरातून 17 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. 
 
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये पहाटेपासून चकमक सुरु होती. दहशतवादी परिसरातील एका घरात लपून बसले होते. या गोळीबारात ज्या दोन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. 
 "बाटपोरा गावात दहशतवादी एका घरात लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी ऑपरेशन लाँच केलं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. क्रॉस फायरिंग सुरु असताना एका महिलेला गोळी लागून ती जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता", अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 
 "ताहिरा असं या 44 वर्षीय महिलेचं नाव आहे. चकमकीदरम्यान जखमी झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिला वाचवू शकलो नाही", अशी माहिती अधिका-यांनी दिली. दुस-या व्यक्तीचं नाव शादाब अहमद चोपान (21) असं आहे.
 
याआधी सुरक्षा जवानांनी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर संपुर्ण परिसरात गराडा घातला होता, आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बशीर लष्करी असल्याची तेव्हा माहिती मिळाली होती. काश्मीरमधील पोलीस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलीस कर्मचा-यांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. 16 जून रोजी ही हत्या झाली होती. 
 
फिरोज अहमद दार
 
 
 
 सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. दहशतवादी सामान्यांचा ढाल म्हणून वापरत करत होते. अखेर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं, आणि त्यांनी सामन्यांचीही सुटका केली.