शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

किसान रॅलीतच घेतली फाशी

By admin | Updated: April 23, 2015 06:16 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा होता आणि आम आदमी पार्टीच्या (आप) किसान रॅलीत भाग घेण्यासाठी आला होता.गजेंद्र सिंग याच्या आत्महत्येवरून राजकीय पक्षांमध्ये दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. या आत्महत्येसाठी ‘आप’ने भाजपा सरकारला जबाबदार धरले आहे, तर भाजपाने पलटवार करीत ‘आप’ला दोषी ठरविले आहे. दुसरीकडे काँग्रेसने आप आणि भाजपा या दोघांनाही लक्ष्य बनवित केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. परिश्रमी शेतकऱ्याने आपण एकटे आहोत असा विचार कधीही करू नये. भारतातील शेतकऱ्यांचा चांगला भविष्यकाळ घडविण्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर दिली.शेतकरी आत्महत्या करीत असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भाषण ठोकत होते. महत्त्वाचे काय आहे, एखाद्याचा जीव की भाषण? आप नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. हा एक कट आहे. गजेंद्र सिंगने आत्महत्या केली हे माहीत असतानाही केजरीवाल भाषण देत राहिले, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते सम्बित पात्रा यांनी केला.‘आप’च्या रॅलीत शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच जबाबदार असल्याकारणाने या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध आत्महत्येस बाध्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. या आत्महत्येसाठी मोदी आणि केजरीवाल हे दोघेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दिल्ली पोलीस केंद्राच्या अंतर्गत येतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारलाच जबाबदार धरले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले.‘आप’च्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या राजस्थानच्या शेतकऱ्याला राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी श्रद्धांजली वाहिली. माझे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांचे कल्याण व उन्नतीसाठी कटिबद्ध आहे, असे राजे म्हणाल्या.पंतप्रधान मोदी हे बडे उद्योगपती आणि मोठ्या धनिकांसाठीच आपले सरकार चालवित आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. भूसंपादन वटहुकूम घाईगडबडीत जारी केल्याबद्दल केजरीवाल यांनी सरकारवर प्रहार केला.ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मतांवरच सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आता त्याच शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. आता मोदी सरकारने एका वर्षातच शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. भूसंपादन विधेयकाला विरोध करीत हजारोंच्या संख्येत शेतकरी या रॅलीत येत आहेत. मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. हे केवळ मोदींच्या सभोवताल २४ तास फिरणाऱ्या बड्या धनिकांचे सरकार आहे. भूसंपादन वटहुकूम पुन्हा जारी करण्याची एवढी घाई का केली, असा सवाल केजरीवाल यांनी मोदींना केला.