शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

किसान रॅलीतच घेतली फाशी

By admin | Updated: April 23, 2015 06:16 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमक्ष बुधवारी एका शेतकऱ्याने किसान रॅलीत आत्महत्या केली. मृत शेतकरी गजेंद्र सिंग हा राजस्थानच्या दौसाचा राहणारा होता आणि आम आदमी पार्टीच्या (आप) किसान रॅलीत भाग घेण्यासाठी आला होता.गजेंद्र सिंग याच्या आत्महत्येवरून राजकीय पक्षांमध्ये दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. या आत्महत्येसाठी ‘आप’ने भाजपा सरकारला जबाबदार धरले आहे, तर भाजपाने पलटवार करीत ‘आप’ला दोषी ठरविले आहे. दुसरीकडे काँग्रेसने आप आणि भाजपा या दोघांनाही लक्ष्य बनवित केंद्र आणि राज्य सरकारविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. परिश्रमी शेतकऱ्याने आपण एकटे आहोत असा विचार कधीही करू नये. भारतातील शेतकऱ्यांचा चांगला भविष्यकाळ घडविण्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर दिली.शेतकरी आत्महत्या करीत असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भाषण ठोकत होते. महत्त्वाचे काय आहे, एखाद्याचा जीव की भाषण? आप नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. हा एक कट आहे. गजेंद्र सिंगने आत्महत्या केली हे माहीत असतानाही केजरीवाल भाषण देत राहिले, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते सम्बित पात्रा यांनी केला.‘आप’च्या रॅलीत शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच जबाबदार असल्याकारणाने या दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध आत्महत्येस बाध्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. या आत्महत्येसाठी मोदी आणि केजरीवाल हे दोघेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री आणि दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दिल्ली पोलीस केंद्राच्या अंतर्गत येतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारलाच जबाबदार धरले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले.‘आप’च्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या राजस्थानच्या शेतकऱ्याला राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी श्रद्धांजली वाहिली. माझे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकऱ्यांचे कल्याण व उन्नतीसाठी कटिबद्ध आहे, असे राजे म्हणाल्या.पंतप्रधान मोदी हे बडे उद्योगपती आणि मोठ्या धनिकांसाठीच आपले सरकार चालवित आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. भूसंपादन वटहुकूम घाईगडबडीत जारी केल्याबद्दल केजरीवाल यांनी सरकारवर प्रहार केला.ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मतांवरच सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आता त्याच शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. आता मोदी सरकारने एका वर्षातच शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे. भूसंपादन विधेयकाला विरोध करीत हजारोंच्या संख्येत शेतकरी या रॅलीत येत आहेत. मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. हे केवळ मोदींच्या सभोवताल २४ तास फिरणाऱ्या बड्या धनिकांचे सरकार आहे. भूसंपादन वटहुकूम पुन्हा जारी करण्याची एवढी घाई का केली, असा सवाल केजरीवाल यांनी मोदींना केला.