शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

जवानांना मारलेल्या प्रत्येक थप्पडीसाठी 100 जिहादींना ठार करा - गौतम गंभीर

By admin | Updated: April 13, 2017 16:27 IST

भारतीय जवानांना मारल्या जाणा-या प्रत्येक थप्पडीच्या बदल्यात 100 जिहादींना ठार मारा अशा शब्दात भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपला संताप व्यक्त केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - भारतीय जवानांना मारल्या जाणा-या प्रत्येक थप्पडीच्या बदल्यात 100 जिहादींना ठार मारा अशा शब्दात भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपला संताप व्यक्त केला आहे. काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संतापलेल्या गौतम गंभीरने टि्वटकरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
भारतीय संघात सलामीवीराचा भूमिका बजावणारा गौतम गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना छेडतानाचा तसंच मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जवानांना मिळणारी वागणूक पाहता भारतीयांचं रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. 
 
ज्यांना आझादी हवी आहे त्यांनी आताच देश सोडून चालते व्हा. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे अशा गंभीरने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. मागच्या महिन्यातही गौतम गंभीरने भारतीय लष्कराची बाजू उचलून धरली होती. पण यावेळी त्याने दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमैहर कौरचाही बचाव केला होता. 
 
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी श्रीनगरमध्ये जोरदार हिंसाचार झाला होता. या व्हिडीओत हे जवान मतदान केंद्रावरुन परतत असल्याचं दिसत आहे. यावेळी हे जवान एव्हीएम घेऊन परतत असताना काही तरुण या जवानांवर हल्ला करत हाताने, पायाने मारहाण करत आहेत. तसंच यावेळी विरोधात घोषणाही दिल्या जात असल्याचं ऐकू येत आहे. एका तरुणाने तर जवानाचं हेल्मेटही फेकून दिलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे.