शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अद्रमुकच्या दोन्ही गटांना ‘खो’, हायकोर्टाचा आदेश; शक्तिप्रदर्शनाला तूर्त मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:08 IST

अण्णा द्रमुकमधील यादवी शिगेला पोहोचली असतानाच मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमताचा ठराव मांडण्यास मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी पुढील आदेश होईपर्यंत मनाई केली.

चेन्नई : अण्णा द्रमुकमधील यादवी शिगेला पोहोचली असतानाच मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमताचा ठराव मांडण्यास मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी पुढील आदेश होईपर्यंत मनाई केली.दिनकरन गटाच्या १८ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभाध्यक्ष पी. धनपाल यांच्या सोमवारच्या निर्णयास न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली नाही आणि १८ आमदारांच्या अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या विधानसभांच्या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यासही पुढील आदेश होईपर्यंत मनाई केली. अपात्र आठ आमदारांनी विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध केलेल्या याचिका न्या. एम. दोरायस्वामी यांच्यापुढे सुनावणीस घेण्यात आल्या. याखेरीज पलानीस्वामी सरकारला लगेच बहुमत सिद्ध करण्यास सांगावे यासाठीची द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांची याचिकाही न्यायालयापुढे आहे.सुनावणीच्या वेळी अपात्र आमदारांसाठी दुष्यंत दवे, विधानसभाध्यक्षांसाठी सी. ए. सुंदरम व स्टॅलिन यांच्यासाठी कपिल सिब्बल इत्यादी ज्येष्ठ वकिलांचे म्हणणे न्या. दोरायस्वामी यांनी ऐकून घेतले. पुढील आदेश होईपर्यंत विधानसभेत शक्तिप्रदर्शन घेतले जाऊ नये व अपात्र जागा भरण्यासाठी निवडणूकही घेतली जाऊ नये, असेही ठरले. पुढील सुनावणी ४ आॅक्टोबर रोजी होईल. याआधी न्यायालयाने बुधवारपर्यंत विधानसभेत शक्तिप्रदर्शन घेऊ नये, असे सांगितले होते. ती मनाई आता पुढील आदेश होईपर्यंत लागूराहील. (वृत्तसंस्था)>तामिळनाडूमध्ये कुरघोडीचे राजकारण१८ आमदारांनी पलानीस्वामी यांना आपला पाठिंबा नसल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे पलानीस्वामी यांना बहुमत सिद्ध करणे शक्य नाही. त्यांना अपात्र ठरविल्याने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध होणे शक्य होणार होते. त्यामुळे पलानीस्वामी यांना बहुमतासाठी १०८ आमदारांचा पाठिंबा पुरेसा होता. परंतु आता दोन्ही गटांच्या कुरघोडीच्या राजकारणास खीळ बसली आहे.